शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

डीजीपीच्या निवडीसाठी अखेर प्रस्ताव यूपीएससीकडे; पोलीस दलातील फेरबदलामुळे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 07:42 IST

परमबीर सिंग यांच्यासह ११ जणांचा समावेश

जमीर काझी

मुंबई : आरोप-प्रत्यारोपामुळे बिकट परिस्थितीतून जाणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला पूर्णवेळ प्रमुख मिळावा, यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीकडे राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठविण्यात आला. मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यानंतर थेट गृहमंत्र्यांवर ‘गंभीर’ आरोप करून महाविकास आघाडीला अडचणीत आणलेल्या परमबीर सिंग यांच्यासह ११ ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

१९८९ पर्यंतच्या आयपीएस तुकडीतील हे अधिकारी आहेत. त्यापैकी तीन नावे महिन्याभरात निवड समितीकडून पाठविली जातील, असे विभागातील सूत्रांनी सांगितले. केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्याने सुबोध जायसवाल यांना ७ जानेवारीला पोलीस महासंचालक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. यूपीएससी निवड समितीकडून मान्यता मिळालेल्यांपैकी एकाची नियुक्ती या पदावर करावी लागणार असल्याने त्यांच्या जागी तात्पुरता पदभार तत्कालीन ‘एल अँड टी’चे प्रमुख हेमंत नगराळे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर आठवड्याभरात प्रस्ताव यूपीएससीकडे पाठविणे आवश्यक होते, परंतु गृह विभागाने तो मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी कार्यालयात पाठविल्यानंतर जवळपास दोन महिने प्रलंबित होता.

१६ मार्चला त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ताे गृह विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र दरम्यानच्या कालावधीत दोघे निवृत्त, तर एकजण प्रतिनियुक्तीवर गेल्याने त्यामध्ये बदल करणे आवश्यक होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ‘अँटिलिया’जवळ पार्क केलेल्या गाडीतील जिलेटीन कांड्यांचा पोलीस दलात ‘ट्रान्सफर स्फोट’ झाला. परमबीर सिंग यांची होमगार्डला उचलबांगडी करण्यात आली, तर नगराळे यांना आयुक्त बनविण्यात आले. हे सर्व बदल नमूद करून अखेर ११ अधिकाऱ्यांचा प्रस्ताव यूपीएससी निवड समितीकडे नुकताच पाठविण्यात आला.

निवडीचे सर्वाधिकार राज्य सरकारला, पण..

डीजीपीच्या नियुक्तीसाठी संबधित राज्यातील तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावे यूपीएससी निश्चित करेल, त्यापैकी एकाची निवड राज्य सरकार करेल, त्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नावे आहेत, त्यामध्ये १९८६ च्या बॅचचे संजय पांडे, १९८७ च्या बॅचचे हेमंत नगराळे, १९८८ च्या बॅचचे परमबीर सिंग, रजनीश सेठ, के. व्यंकटेशम, तर १९८९च्या बॅचचे संदीप बिष्णोई, विवेक फणसाळकर, भूषण कुमार उपाध्याय, संजयकुमार, राजेंद्रसिंह आणि प्रज्ञा सरवदे यांचा समावेश आहे.

...म्हणून रश्मी शुक्लांना वगळले

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे सध्या वादात सापडलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला याही डीजीपीच्या नियुक्तीसाठी पात्र होत्या. मात्र गेल्या महिन्यात त्या केंद्रीय राखीव दलात प्रतिनियुक्तीवर गेल्याने त्यांचे नाव या प्रस्तावातून वगळण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसParam Bir Singhपरम बीर सिंगRashmi Shuklaरश्मी शुक्ला