शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

काही खरे नाही, चक्क मरण पावलेल्या व्यक्तीला केले आरोपी; एकाच गुन्ह्यासाठी दोनदा FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:04 IST

मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली.

मुंबई :  मालवणी पोलिसांनी तीन वर्षांत एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र (एफआयआर) नोंद केला आहे. मुख्य म्हणजे गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचेही नाव नमूद केले. हा गुन्हा बोरिवली तहसीलदार कार्यालयाच्या विभागीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार करण्यात आल्याने स्थानिक तक्रारदारांचे आणि अधिकाऱ्यांचे यात साटेलोटे असल्याचा आरोप वकिलाकडून करण्यात आला आहे.

मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली. याप्रकरणी बोरिवली तहसीलदार कार्यालयातील विभागीय अधिकारी संतोष लोकरे यांनी २७ डिसेंबर,२०२१ रोजी घटनास्थळी भेट दिल्यावर  केलेल्या तक्रार अर्जावरून मालवणी पोलिसांनी ५ जानेवारी रोजी त्रिलोकनाथ तिवारी ऊर्फ मौजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात बाबुमियाँ सरदार आणि शशी दुबे ही नावे आरोपी म्हणून जोडण्यात आली.  

स्थानिकांकडे चौकशी केली असता झोपड्या या तिघांच्या असल्याचे समजल्याचे लोकरे यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, तिवारी याच्यावर याच गुन्ह्यात २०१९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जिल्हाधिकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याच्या आरोपावरून त्याला अटकही करण्यात आली होती. तर दुबे हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या उत्तर प्रदेश येथील गावी असताना ३० एप्रिल २०२१ रोजी त्याचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या एफआयआरमध्येही टाकत मालवणी पोलिसांनी कलम ४४१ (जो कोणी गुन्हा करण्याच्या हेतूने दुसऱ्याच्या ताब्यातील मालमत्तेमध्ये किंवा त्याच्या ताब्यात प्रवेश करतो), ४४७ (गुन्हेगारी घुसखोरी) आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. सरकारी यंत्रणेची दिशाभूल करून पिळवणूक करण्याच्या उद्देशाने काही खोडकर घटक हे प्रकार करत असून अधिकाऱ्यांचेही त्यांना पाठबळ असल्याचा संशय यातून व्यक्त केला जात आहे.

 मग ‘त्याचा’ मृत्यू  झाल्याचे नाही समजले? ‘माझ्या अशिलावर मालवणी पोलिसांनी दुसरा एफआयआर दाखल करण्यापूर्वी स्वत:च्या नोंदी तपासल्या नसल्याचे दिसून येते. त्यांनी २०१९ मध्ये त्याच गुन्ह्यासाठी एफआयआर दाखल करत कलम ४४७ अंतर्गत अटक केली ज्यात त्याची जामिनावर सुटका झाली. या खटल्यात आरोपपत्रही दाखल केले. मात्र, २०२१ मध्ये तहसीलदार कार्यालयातून आलेल्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट न देताच निव्वळ स्थानिक तक्रारदाराच्या सांण्यावरून तक्रार केल्याचा संशय मला आहे. कारण त्यांनी जर भेट दिली असती तर दुबे यांच्या मृत्यूबाबत त्यांना माहिती मिळाली असती. त्यानुसार स्थानिक तक्रारदार आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचेच यातून समोर येत आहे’. - विजय शुक्ला, आरोपी तिवारीचे वकील 

बोरीवली तहसीलदारांचे ‘मौन’ 

ॲड. शुक्ला यांच्या आरोपाबाबत बाजू जाणून घेण्यासाठी ‘’लोकमत’’ प्रतिनिधीने तहसीलदार विनोद धोत्रे यांना फोन आणि मेसेजवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. तसेच मेसेजला देखील उत्तर दिले नाही.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी