शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

काही खरे नाही, चक्क मरण पावलेल्या व्यक्तीला केले आरोपी; एकाच गुन्ह्यासाठी दोनदा FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:04 IST

मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली.

मुंबई :  मालवणी पोलिसांनी तीन वर्षांत एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र (एफआयआर) नोंद केला आहे. मुख्य म्हणजे गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचेही नाव नमूद केले. हा गुन्हा बोरिवली तहसीलदार कार्यालयाच्या विभागीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार करण्यात आल्याने स्थानिक तक्रारदारांचे आणि अधिकाऱ्यांचे यात साटेलोटे असल्याचा आरोप वकिलाकडून करण्यात आला आहे.

मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली. याप्रकरणी बोरिवली तहसीलदार कार्यालयातील विभागीय अधिकारी संतोष लोकरे यांनी २७ डिसेंबर,२०२१ रोजी घटनास्थळी भेट दिल्यावर  केलेल्या तक्रार अर्जावरून मालवणी पोलिसांनी ५ जानेवारी रोजी त्रिलोकनाथ तिवारी ऊर्फ मौजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात बाबुमियाँ सरदार आणि शशी दुबे ही नावे आरोपी म्हणून जोडण्यात आली.  

स्थानिकांकडे चौकशी केली असता झोपड्या या तिघांच्या असल्याचे समजल्याचे लोकरे यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, तिवारी याच्यावर याच गुन्ह्यात २०१९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जिल्हाधिकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याच्या आरोपावरून त्याला अटकही करण्यात आली होती. तर दुबे हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या उत्तर प्रदेश येथील गावी असताना ३० एप्रिल २०२१ रोजी त्याचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या एफआयआरमध्येही टाकत मालवणी पोलिसांनी कलम ४४१ (जो कोणी गुन्हा करण्याच्या हेतूने दुसऱ्याच्या ताब्यातील मालमत्तेमध्ये किंवा त्याच्या ताब्यात प्रवेश करतो), ४४७ (गुन्हेगारी घुसखोरी) आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. सरकारी यंत्रणेची दिशाभूल करून पिळवणूक करण्याच्या उद्देशाने काही खोडकर घटक हे प्रकार करत असून अधिकाऱ्यांचेही त्यांना पाठबळ असल्याचा संशय यातून व्यक्त केला जात आहे.

 मग ‘त्याचा’ मृत्यू  झाल्याचे नाही समजले? ‘माझ्या अशिलावर मालवणी पोलिसांनी दुसरा एफआयआर दाखल करण्यापूर्वी स्वत:च्या नोंदी तपासल्या नसल्याचे दिसून येते. त्यांनी २०१९ मध्ये त्याच गुन्ह्यासाठी एफआयआर दाखल करत कलम ४४७ अंतर्गत अटक केली ज्यात त्याची जामिनावर सुटका झाली. या खटल्यात आरोपपत्रही दाखल केले. मात्र, २०२१ मध्ये तहसीलदार कार्यालयातून आलेल्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट न देताच निव्वळ स्थानिक तक्रारदाराच्या सांण्यावरून तक्रार केल्याचा संशय मला आहे. कारण त्यांनी जर भेट दिली असती तर दुबे यांच्या मृत्यूबाबत त्यांना माहिती मिळाली असती. त्यानुसार स्थानिक तक्रारदार आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचेच यातून समोर येत आहे’. - विजय शुक्ला, आरोपी तिवारीचे वकील 

बोरीवली तहसीलदारांचे ‘मौन’ 

ॲड. शुक्ला यांच्या आरोपाबाबत बाजू जाणून घेण्यासाठी ‘’लोकमत’’ प्रतिनिधीने तहसीलदार विनोद धोत्रे यांना फोन आणि मेसेजवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. तसेच मेसेजला देखील उत्तर दिले नाही.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी