शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पोलीस अधिकाऱ्याला एक दिवसाचा तुरुंगवास, दंड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:21 IST

अर्नेश कुमार मार्गदर्शक तत्त्वांचा भंग: अटकेपूर्वी नोटीस दिली नाही 

- खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून एका व्यक्तीला अटक केल्याबद्दल पोलीस अधिकारी न्यायालयाच्या अवमानाचा दोषी ठरला. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला एक दिवसाची शिक्षा, २००० दंड आणि १५,००० रुपये नुकसानभरपाईचे आदेश दिले.

दिल्लीतील राकेश कुमार यांच्याविरुद्ध ४०६ आयपीसीचा (विश्वासघात) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी कमाल तीन वर्षांची शिक्षा आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली नाही. ११ दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. 

सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार निकालामध्ये अटकेपूर्वी ४१ अ सीआरपीसीप्रमाणे नोटीस देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली नाही. अर्नेश कुमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस न देणाऱ्या व या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाची कारवाई केली जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

अटक केलेल्या व्यक्तीलाच फक्त अपमान सहन करावा लागतो असे नाही. त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर अटकेचा परिणाम होतो. ज्यांनी अटक पाहिली असेल त्यांना कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याला आणि त्याच्या नातेवाइकांना झालेल्या त्रासाची भरपाई होत नाही.अर्नेश कुमार मार्गदर्शक तत्त्वे हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे. ज्यामध्ये सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये अटक अपवाद असावी व पोलिसांना अटक करणे आवश्यक आहे की नाही हे निर्धारित करावे, असे सांगितले आहे.

४१ अ सीआरपीसी : ज्या व्यक्तीविरुद्ध ७ वर्षांपर्यंतच्या शिक्षेचा दखलपात्र गुन्हा नोंदवला गेला आहे, अशा व्यक्तीला त्याच्यासमोर हजर राहण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने नोटीस देणे आवश्यक आहे. नोटीसचे पालन होते तोपर्यंत त्याला अटक केली जाणार नाही, अशी तरतूद आहे.

अटक आणि तुरुंगवासामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा संपते. त्याचा इतर अनेक निष्पाप नातेवाइकांवरही परिणाम होतो. नंतरच्या सुटकेने प्रतिष्ठेचे नुकसान किंवा मौल्यवान वैयक्तिक स्वातंत्र्याच्या तात्पुरत्या नुकसानीची भरपाई होत नाही. ज्याला पोलिसांनी नेले आहे, ताब्यात घेतले आहे आणि तुरुंगात टाकले आहे त्याच्यावर कायम कलंक लागतो.   -न्यायमूर्ती नजमी वझिरी, दिल्ली उच्च न्यायालय

टॅग्स :Policeपोलिस