शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला; हात उखडून बॅरिकेड्सला लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 10:00 IST

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या ३ कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही.युवकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. ज्या युवकाला मारलं त्याचा डावा हात कापण्यात आला होता

नवी दिल्ली – सिंधु बॉर्डर(Sindhu Border) ज्याठिकाणी शेतकरी आंदोलन करत होते त्याठिकाणी एका युवकाची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. युवकाचा हात कापून बॅरिकेड्सला लटकवला आहे. मृतदेह आढळल्यानंतर सिंधु बॉर्डरवर मोठी खळबळ माजली. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला पोलिसांना मुख्य व्यासपीठाजवळ जाण्यास रोखले परंतु त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेत सामान्य रुग्णालयात पाठवला.

सिंधु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या(Farmers Protest) मुख्य व्यासपीठावर सकाळी हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. मृत युवकाचं वय ३५ वर्ष होतं. युवकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. ज्या युवकाला मारलं त्याचा डावा हात कापण्यात आला होता. युवकावर गुरु ग्रंथ साहिबची बदनामी केल्याचा संशय होता. या हत्येचा आरोप निहंगांवर लावण्यात आला आहे. निहंगांचा आरोप आहे की, युवकाला षडयंत्र म्हणून इथं पाठवण्यात आलं होतं. त्यासाठी त्याला ३० हजार रुपये दिले होते. युवकाने पवित्र गुरु ग्रंथ साहिबचं भंग केला.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या ३ कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ९ महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही. कृषी विधेयकं मागे घ्यावीत अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे. तर विधेयक मागे घेतले जाणार नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार विधेयकात बदल करण्याची सरकारची तयारी आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये संताप

काही दिवसांपूर्वी लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Violence) येथे शेतकरी आंदोलनात एक थार गाडी वेगाने येऊन शेतकऱ्यांना चिरडून पुढे गेली. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये शेतकरी हातात काळे झेंडे घेऊन एकत्र पुढे जात असलेले पाहायला मिळत होते. याचवेळी अचानक पाठीमागून एक गाडी वेगाने पुढे येथे आणि शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाते. त्यानंतर त्यापाठोपाठ दोन आणखी गाड्या वेगाने निघून जातात. या घटनेने नंतर एकच गोंधळ उडतो. शेतकरी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागतात. या घटनेत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार