शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

१९८४ च्या दंगलीतील राज्यातील मृतांच्या वारसांना पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 21:35 IST

या वर्षासाठी चौघांना १.२० लाखाची मदत; केंद्राची निवृत्तवेतन योजना

ठळक मुद्देदरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरवातीला त्याबाबतच्या निधीची तरतूद केली जात असते.चार मृतांच्या वारसांना वर्षाला प्रत्येकी ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जमीर काझीमुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीमधील मृतांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या निवृत्तीवेतनाचा लाभ राज्यातील चौघांना मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी द्यावयाची मदतीला अखेर ‘मुर्हूत’ मिळाला असून चौघांसाठी १.२० लाखाचा निधी राज्य शासनाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. अहमदनगर व बुलढाणा जिल्ह्यातील हे लाभार्थी असून त्यांच्या १२ महिन्याची रक्कम संबंधित विभागीय आयुक्तालयाकडे सर्पूद करण्यात आली असल्याचे महसूल विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून हत्या झाल्यानंतर संतप्त झालेल्या समर्थकांनी हिंसाचार केला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली होती. त्याचे पडसाद दिर्घकाळ राजकारणात होत राहिले. दंगलीला जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करुन खटला दाखल करण्यात आले होते. या दंगलीची चौकशी न्या. नानावटी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून करण्यात आली होती. त्यांनी सूचविलेल्या शिफारशीनुसार १६ जानेवारी २००६ रोजी केंद्रातील तत्कालिन युपीए सरकारने दंगलीतील मृतांच्या वारसांना प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला. या दंगलीमध्ये राज्यातील चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पात्र वारसांना मदत देण्यात येत होती. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरवातीला त्याबाबतच्या निधीची तरतूद केली जात असते.

मात्र, २०१९-२० या आर्थिक वर्षातील निवृत्ती वेतन संबंधितांना अद्याप देण्यात येत नव्हते. आर्थिक वर्ष संपण्याला अडीच महिन्याचा अवधी असताना अखेर महसूल विभागाने त्याबाबतची रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग केली आहे. प्रत्येक महिन्याला अडीच हजार याप्रमाणे चार मृतांच्या वारसांना वर्षाला प्रत्येकी ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक व अमरावती विभागीय आयुक्तालयाकडे ही रक्कम वर्ग करण्यात आली असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांपर्यत ती पोहचविली जाणार आहे.दंगलीतील राज्यातील मृत व त्यांचे वारस१९८४ ला झालेल्या भीषण दंगलीमध्ये राज्यात रहिवासी असलेल्या चौघाजणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पिरु उर्फ पिरन हसन सय्यद व सतपाल सिंग नंदपालसिंग तर बुलढाणा जिल्ह्यातील दिनकर सिताराम डाबरे हे मृत्यूमुखी पडले होते. पिरु यांची आई सुग्रबी सय्यद यांना तर उर्वरित तिघांच्या पत्नींना पात्र वारसदार म्हणून निश्चित केले आहे. त्यांना शासनातर्फे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगलIndira Gandhiइंदिरा गांधीbuldhanaबुलडाणाAhmednagarअहमदनगर