शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

श्रीवास हत्याकांडातील आरोपी बागडेला २८ पर्यंत पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 21:40 IST

बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी रवी उर्फ छोटू बागडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.

नागपूर : बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी रवी उर्फ छोटू बागडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.

श्रीवास प्रकरण उघड झाल्यापासून बागडे फरार होता. तो गँगस्टर रणजीत सफेलकर टोळीतील मुख्य गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मृत मनीष श्रीवास, छोटू बागडे आणि इशाक मस्ते हे तिघे खास मित्र होते. ते सफेलकर टोळीत सक्रिय होते. धोका निर्माण झाल्यामुळे सफेलकरने मनीषच्या हत्याकांडाचा कट रचला होता. त्यानुसार बागडेने ३ मार्च २०१२ ला रात्री मनीषला 'मस्त माल आणला आहे', असे सांगून कारमध्ये बसवले. ते पवनगावच्या एका फार्महाऊसवर गेले. तेथे रणजीत सफेलकर, कालू हाटे, भारत हाटे, सिनू अण्णा, इशाक मस्ते, हेमंत गोरखा, विनय बाथो यांनी मनीषवर शस्त्राचे सपासप  घालून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दरीत फेकले.२०१२ च्या या हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी तबबल ९ वर्षांनी केला. त्यात सफेलकरसह आतापावेतो सात जणांना अटक केली. छोटू बागडे मात्र फरार होता.  रविवारी पहाटे  उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी युनिट तीनच्या पथकाकडून त्याला पाचपावलीत नाट्यमयरित्या अटक केली. सोमवारी त्याला न्या. व. भ. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी केली. सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बागडेला २८ मे पर्यंत पीसीआर मंजूर केला.---आणखी गुन्हे उघड होणार ?सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांना पोलिसांनी वेगवेगळ्या तारखेला अटक केली. प्रत्येकाच्या चौकशीतून कोणता ना कोणता मोठा गंभीर गुन्हा उघड झाला. बागडेच्या पीसीआर मधूनही आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता पोलिस अधिकारी वर्तवित आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बी. एन. नलावडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी