शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मोबाइल पाहतो म्हणून पालक ओरडले, १२ वर्षांच्या मुलाने घर सोडले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 07:18 IST

अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला.

मुंबई: वर्सोवा परिसरात एक बारा वर्षाचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जवळपास सात तासांनंतर घराच्या गच्चीवर असलेल्या टाकीच्या खाली झोपलेला तो सापडला. 

अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ देखील या मुलाचा समांतररीत्या शोध घेऊ लागले. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. ज्यात हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडत असताना आणि पुन्हा घराच्या दिशेने परताना दिसत होता. त्यामुळे तो घराच्या आसपास कुठेतरी असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही.  

गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे पोलिस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी घटनास्थळी जात सीसीटीव्ही पाहिल्यावर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला घेऊन ते घराच्या गच्चीवर गेले.   वर असलेल्या टाकीच्या आसपास त्यांनी पाहिले. मात्र, तिथे कोणीच दिसत नव्हते. अखेर म्हेत्रे यांनी टाकीच्या खाली असलेल्या फुटांच्या पोकळीमधून आत प्रवेश केला. त्यावेळी अगदी कोपऱ्यात तो मुलगा त्यांना झोपलेला दिसला. त्याला अलगदपणे खाली आणत नंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

केमिस्टकडून चिप्स घेऊन खाल्लेरात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहतो म्हणून त्याच्या आईने तो काढून घेतला होता. त्या रागात तो निघून गेल्याचे वर्सोवा पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पहाटे उठून त्याने झोपेत अंगावर दोन ते तीन टी शर्ट घातले आणि जवळच्या केमिस्टकडे जात शीतपेय व चिप्स घेऊन खाल्ले, अशीही माहिती आहे. दरम्यान, मुलगा सुखरूप सापडल्याने आम्ही आता ही फाईल बंद करणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  सिराज इनामदार यांनी सांगितले. मुलाच्या वडिलांनी मुलाला शोधण्यात मदत केल्याबाबत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, म्हेत्रे तसेच इनामदार आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.

मुंबई: वर्सोवा परिसरात एक बारा वर्षाचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जवळपास सात तासांनंतर घराच्या गच्चीवर असलेल्या टाकीच्या खाली झोपलेला तो सापडला. अंधेरी पश्चिमच्या रतननगर परिसरात राहणारा संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी घरात नसल्याचे कुुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ देखील या मुलाचा समांतररीत्या शोध घेऊ लागले. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. ज्यात हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडत असताना आणि पुन्हा घराच्या दिशेने परततताना दिसत होता. त्यामुळे तो घराच्या आसपास कुठेतरी असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही.  गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे पोलिस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी घटनास्थळी जात सीसीटीव्ही पाहिल्यावर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला घेऊन ते घराच्या गच्चीवर गेले.   वर असलेल्या टाकीच्या आसपास त्यांनी पाहिले. मात्र, तिथे कोणीच दिसत नव्हते. अखेर म्हेत्रे यांनी टाकीच्या खाली असलेल्या फुटांच्या पोकळीमधून आत प्रवेश केला. त्यावेळी अगदी कोपऱ्यात तो मुलगा त्यांना झोपलेला दिसला. त्याला अलगदपणे खाली आणत नंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

केमिस्टकडून चिप्स घेऊन खाल्लेरात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहतो म्हणून त्याच्या आईने तो काढून घेतला होता. त्या रागात तो निघून गेल्याचे वर्सोवा पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पहाटे उठून त्याने झोपेत अंगावर दोन ते तीन टी शर्ट घातले आणि जवळच्या केमिस्टकडे जात शीतपेय व चिप्स घेऊन खाल्ले, अशीही माहिती आहे. दरम्यान, मुलगा सुखरूप सापडल्याने आम्ही आता ही फाईल बंद करणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  सिराज इनामदार यांनी सांगितले. मुलाच्या वडिलांनी मुलाला शोधण्यात मदत केल्याबाबत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, म्हेत्रे तसेच इनामदार आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी