लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : भारतीय नाैदलातील गाेपनीय माहिती पाकिस्तानी इन्टेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) ला देणाऱ्या कळव्यातील रवी वर्मा याच्या पाेलिस काेठडीत ५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या काेठडीची मुदत साेमवारी संपल्यानंतर त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
नेव्हल डाॅकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवीला महिला पीआयओने हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर त्याने भारतातील १४ पाणबुड्या आणि वेगवेगळ्या युद्धनाैकांची नावासह माहिती त्यांना दिल्याचा आराेप आहे. या पाणबुड्या, युद्धनाैकांचे लाेकेशन सांगून काेणती नाैका काेणत्या ठिकाणी उभी आहे, याची माहितीही दिली. वर्माला एटीएसने २९ मे राेजी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत भारतीय नाैदलाची संवेदनशील माहिती पुरविल्याप्रकरणी अटक केली. ताे पाकिस्तानच्या पायल शर्मा आणि इस्प्रीत या दोन वेगवेगळ्या नावांनी चालविण्यात येत असलेल्या फेसबुक फ्रेंडच्या संपर्कात हाेता.
खुलासा हाेणे अजून बाकी
दरम्यान, त्याने संवेदनशील बाबींची माहिती पाकला पुरविली नसून संबंधित माहिती गुगलवरही उपलब्ध असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. त्याच्याकडे मिळालेल्या निळ्या डायरीमध्येही काेणतीही विशेष माहिती नसून त्यात दाेन पानांव्यतिरिक्त काही नाही. काेणाचे नावही नाही. त्यात केवळ आजचे काम काय? आणि उद्याचे काम काय? अशी राेजनिशी आहे. त्याने युद्धनाैकांसह आणखीही काेणती माहिती पाकच्या हेरगिरी करणाऱ्या पीआयओंना दिली, याचा खुलासा हाेणे बाकी असल्याने त्याच्या काेठडीत वाढ करण्याची मागणी एटीएसने न्यायालयात केली.
वर्मा म्हणताे, मी खूप घाबरलाेय!
जीन्स पॅन्ट आणि पांढरा शर्ट परिधान केलेल्या आराेपी वर्माला न्यायालयाने एटीएसविरुद्ध काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा आपल्याला एटीएसविरुद्ध काेणतीही तक्रार नाही; मात्र, आपण खूप घाबरलाे असल्याचे ताे म्हणाला. काेणतीही नाेटीस न बजावता, त्याला अटक केल्याचा दावा करीत त्याच्यावरील आराेपांचे त्याच्या वकिलांनी खंडन केले.