शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पाकिस्तानला धक्का, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 17:51 IST

उद्या बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देआज  पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलने आपल्या युक्तीवादाची सुरुवातच खोट्या विधानांनी केली. आंतराष्ट्रीय कोर्टाच्या पॅनलचे अध्‍यक्ष अब्‍दुल कावी अहमद युसूफ यांनी कुरेशी यांना हळू आवाजात युक्तिवाद करण्यास टोकले.सुरुवातीलाच कुलभूषणच्या बोगस पासपोर्ट आणि अन्य बाबींवर चढ्या आवाजात युक्तिवाद करत होते.

द हेग - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतराष्ट्रीय कोर्टात कालपासून सुनावणी सुरु झाली असून आज या सुनावणीच्या दुसरा दिवस. काल दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. तर आज  पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलने आपल्या युक्तीवादाची सुरुवातच खोट्या विधानांनी केली. त्यावेळी सुरुवातीलाच कुलभूषणच्या बोगस पासपोर्ट आणि अन्य बाबींवर चढ्या आवाजात युक्तिवाद करत होते. त्यावेळी आंतराष्ट्रीय कोर्टाच्या पॅनलचे अध्‍यक्ष अब्‍दुल कावी अहमद युसूफ यांनी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान  यांना हळू आवाजात युक्तिवाद करण्यास टोकले. तसेच आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करावा अशी मागणी पाकिस्तानतर्फे करण्यात आली होती. ती मागणी देखील कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने उद्या तिसऱ्या दिवसापर्यंत स्थगित केली आहे. उद्या बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे.    

जाधवच नव्हे तर भारतावरही पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान म्हणाले, 'मी स्वत: भारतीय क्रूरतेचा शिकार आहे. मी तरुण लष्करी अधिकारी म्हणून भारतीय तुरुंगात कैद होतो. पाकिस्तानमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० मुलांचे जीव गेले. हा भारताचा पाठिंबा असणाऱ्या अफगाणिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला होता. पाकिस्तानने आंतराष्ट्रीय कोर्टात नऊ मुद्दे ठेवले असून जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होता आणि त्याने पाकिस्तानात दहशत पसरवण्यासाठी अनेक पाकिस्तानविरोधी शक्तींना सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी तयार केले होते. पूर्ण देश याला खतपाणी घालत आहे. विचित्र वागणुकीतून कुलभूषण मुक्त, दोषमुक्त करा असा दावा भारताकडून केला जात आहे. मात्र, भारताकडे विश्वासाची कमरतात असल्याची टीका करत पाकिस्तानने युक्तिवाद केला आहे. उद्या दुपारी ३ वाजता भारत आणि पाकिस्तानला बाजू मांडण्यासाठी दुसऱ्यांदा वेळ देण्यात आली असून युक्तिवादात तेच तेच मुद्दे पुन्हा येऊ नयेत याची काळजी काळजी घेण्याचे कोर्टाने बजावले आहे. 

काल पार पडलेल्या सुनावणीवेळी दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. यावेळी यांनी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने केलेल्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. तसेच पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असून, तब्बल 13 वेळी विनंती करूनही कुलभूष जाधव यांना कौन्सिलर अॅक्सेस दिलेला नाही. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत, मात्र पाकिस्तान त्यांना फसवून आपला अजेंडा पुढे रेटू पाहत आहे, असा आरोपही साळवे यांनी केला.  

कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवCourtन्यायालयPakistanपाकिस्तानIndiaभारत