शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने नवऱ्याला चोपला; प्रकरण ऐकून पोलीसही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 14:12 IST

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले

हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं लग्न मंडपातून सात फेरे घेऊन सासरी पोहचलेल्या मुलीने असं कृत्य केले ज्याने संपूर्ण गावात लोक आश्चर्यचकीत झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवरीच्या डोक्यावरील पदर काढला त्यामुळे संतापलेल्या नवरीने पतीच्या कानशिलात लगावली. नवरीने नवऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे कुटुंबाला धक्का बसला. 

नवरीकडून झालेल्या मारहाणीमुळे नवरा आणि त्याचे कुटुंब पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्हीकडील मंडळी काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. हमीरपूर जिल्ह्यातील सुरेश कुमार याचे लग्न इमिलिया गावातील मुलीशी झाले. नवरी असलेली संगीता या लग्नामुळे खुश नव्हती. मुलीकडच्या तिचे जबरदस्तीने लग्न लावले. लग्नाच्या दिवशी मुलीकडच्यांनी नवऱ्याकडील सर्व पाहुणेमंडळींचे आदरतिथ्य केले. 

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले. यानंतर नवरा-नवरीने मिळून सात फेरे घेतले. लग्नानंतर वधूचा निरोप समारंभ पार पडला. सासरी येताच वराच्या घरी पूजा करून इतर विधी पूर्ण करण्यात आले, मात्र लग्नाच्या रात्री वधूने वराला अशी भेट दिली, ज्यामुळे संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले.

पदर हटवताच नवरीने नवऱ्याचा कानाखाली मारलीलग्न पार पडल्यानंतर सासरच्या घरी येताच नववधूचा पारा चढला. खोलीत वराच्या मधुचंद्राची तयारी करण्यात आली होती. खोलीही चांगली सजवली होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, वराने वधूच्या डोक्यावरील पदर काढताच तिला राग आला, तिने हनिमूनच्या बेडवर वराला मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात वराला दुखापत झाली. वधूचे हे रूप पाहून नवरा खोलीतून बाहेर आला आणि त्याने घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाइकांनी रात्रीच नवरीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कुणाचे काही ऐकले नाही. 

रक्तबंबाळ झालेल्या वराला पाहून पोलीसही चकितकुरारा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पवन कुमार पटेल यांनी शनिवारी सांगितले की, लग्नानंतर सासरी आलेल्या नववधूने वराला बेदम मारहाण केल्याची घटना पोलिस ठाण्यात आली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि घटनेची चौकशी करून दोघांनाही समजावून सांगण्यात आले, परंतु कोणतीही बाजू मागे हटण्यास तयार नाही. वधू आणि वरांना घरगुती प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले. तेथून हे प्रकरण निकाली काढले जाईल.