शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने नवऱ्याला चोपला; प्रकरण ऐकून पोलीसही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 14:12 IST

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले

हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं लग्न मंडपातून सात फेरे घेऊन सासरी पोहचलेल्या मुलीने असं कृत्य केले ज्याने संपूर्ण गावात लोक आश्चर्यचकीत झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवरीच्या डोक्यावरील पदर काढला त्यामुळे संतापलेल्या नवरीने पतीच्या कानशिलात लगावली. नवरीने नवऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे कुटुंबाला धक्का बसला. 

नवरीकडून झालेल्या मारहाणीमुळे नवरा आणि त्याचे कुटुंब पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्हीकडील मंडळी काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. हमीरपूर जिल्ह्यातील सुरेश कुमार याचे लग्न इमिलिया गावातील मुलीशी झाले. नवरी असलेली संगीता या लग्नामुळे खुश नव्हती. मुलीकडच्या तिचे जबरदस्तीने लग्न लावले. लग्नाच्या दिवशी मुलीकडच्यांनी नवऱ्याकडील सर्व पाहुणेमंडळींचे आदरतिथ्य केले. 

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले. यानंतर नवरा-नवरीने मिळून सात फेरे घेतले. लग्नानंतर वधूचा निरोप समारंभ पार पडला. सासरी येताच वराच्या घरी पूजा करून इतर विधी पूर्ण करण्यात आले, मात्र लग्नाच्या रात्री वधूने वराला अशी भेट दिली, ज्यामुळे संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले.

पदर हटवताच नवरीने नवऱ्याचा कानाखाली मारलीलग्न पार पडल्यानंतर सासरच्या घरी येताच नववधूचा पारा चढला. खोलीत वराच्या मधुचंद्राची तयारी करण्यात आली होती. खोलीही चांगली सजवली होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, वराने वधूच्या डोक्यावरील पदर काढताच तिला राग आला, तिने हनिमूनच्या बेडवर वराला मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात वराला दुखापत झाली. वधूचे हे रूप पाहून नवरा खोलीतून बाहेर आला आणि त्याने घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाइकांनी रात्रीच नवरीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कुणाचे काही ऐकले नाही. 

रक्तबंबाळ झालेल्या वराला पाहून पोलीसही चकितकुरारा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पवन कुमार पटेल यांनी शनिवारी सांगितले की, लग्नानंतर सासरी आलेल्या नववधूने वराला बेदम मारहाण केल्याची घटना पोलिस ठाण्यात आली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि घटनेची चौकशी करून दोघांनाही समजावून सांगण्यात आले, परंतु कोणतीही बाजू मागे हटण्यास तयार नाही. वधू आणि वरांना घरगुती प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले. तेथून हे प्रकरण निकाली काढले जाईल.