शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लग्नाच्या दिवशीच प्रियकराने दिला नकार; तरुणीची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:56 IST

वडाळा येथील घटना, तो रोज तिला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी तसेच घेण्यासाठी जात असे

मुंबई -  सायन परिसरात राहणाऱ्या तरुणीची फेसबुकवरून एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तिने त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगविले. लग्नाची तारीखही ठरली. मात्र, लग्नाच्या तारखेलाच प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

सायन परिसरात तक्रारदार २५ वर्षीय तरुणी आजीसोबत राहते. २०१९ मध्ये तिची आसिफ नावाच्या तरुणासोबत फेसबुकवरून ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. त्याने तिला प्रेमाची गळ घातली. तरुणीनेही त्याला होकार दिला. दोघेही वडाळ्यात भेटले. त्यांच्यात गप्पा रंगल्या. भेटी वाढल्या. त्यानंतर मात्र आसिफने तिला लग्नाची मागणी घातली. 

तो रोज तिला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी तसेच घेण्यासाठी जात असे. त्यांच्यात जवळीक वाढली. दोघांमध्ये चार वर्षे चांगले प्रेमसंबंध होते. त्यानंतर मात्र जानेवारी २०२३ मध्ये तरुणीला शिवसेना कार्यालयात नोकरी मिळाली. त्यानंतर आसिफ तिला टाळू लागला. लग्नासाठीही नकार कळवला. नेमके काय झाले, या प्रकाराने तरुणीही गोंधळली. तिने त्याला मनवत लग्नाबद्दल घरी बोलण्यास सांगितले. त्यावर त्याने मला थोडा वेळ हवा आहे. योग्य वेळ आल्यावर बोलतो, असे तिला सांगितले. मात्र, दोघांमधील वाद वाढू लागले.

आसिफच्या वडिलांशी बोलणे झाल्यानंतर तो लग्नाला तयार झाला. न्यायालयात जाऊन त्यांनी लग्नासाठी १ मे तारीखही घेतली. ठरल्याप्रमाणे लग्नाचे स्वप्न रंगवत असताना १ मे रोजी आसिफ लग्नासाठी नकार कळवत ‘नॉट रिचेबल’ झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. दरम्यान, आरोपीला लवकरच पकडू अशी माहिती पोलिसांनी दिली असून त्यासाठी खास पथके नेमलेली आहेत.

टॅग्स :marriageलग्न