शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

तब्बल 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 18:35 IST

Odisha : पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

नवी दिल्ली : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील उच्च न्यायालयाने एका हत्येच्या प्रकरणात 19 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने 3 खून खटल्यातून हबिल सिंधू नावाच्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हबिल सिंधूला सन्मानपूर्वक सोडण्याचे आदेश देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, हबिल सिंधूने जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयाचा सहारा घेतला होता. 

त्यानंतर उच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकिलांकडून (एमिकस क्युरी) पुन्हा तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सरकारी वकिलांनी सिंधूविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील 32 पानी कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली आणि त्याचा अहवाल उच्च न्यायालयात दिला. ज्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा त्याचे वय जवळपास 40 वर्षे होते. 19 वर्षांनंतर हबिल सिंधूला उच्च न्यायालयासमोर कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने तिला निर्दोष घोषित करण्यात आले. निर्दोष सिद्ध झाल्यानंतर हबिल सिंधू खूपच आंनदी दिसून आला. द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हबिल सिंधूने सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे मी खूप खूश आहे. जवळपास 19 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. हा काळ खूप कठीण होता. आता गावी जाऊन शेती करणार आहे.

टॅग्स :jailतुरुंगCourtन्यायालय