शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

तब्बल 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 18:35 IST

Odisha : पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

नवी दिल्ली : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील उच्च न्यायालयाने एका हत्येच्या प्रकरणात 19 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने 3 खून खटल्यातून हबिल सिंधू नावाच्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हबिल सिंधूला सन्मानपूर्वक सोडण्याचे आदेश देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, हबिल सिंधूने जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयाचा सहारा घेतला होता. 

त्यानंतर उच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकिलांकडून (एमिकस क्युरी) पुन्हा तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सरकारी वकिलांनी सिंधूविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील 32 पानी कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली आणि त्याचा अहवाल उच्च न्यायालयात दिला. ज्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा त्याचे वय जवळपास 40 वर्षे होते. 19 वर्षांनंतर हबिल सिंधूला उच्च न्यायालयासमोर कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने तिला निर्दोष घोषित करण्यात आले. निर्दोष सिद्ध झाल्यानंतर हबिल सिंधू खूपच आंनदी दिसून आला. द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हबिल सिंधूने सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे मी खूप खूश आहे. जवळपास 19 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. हा काळ खूप कठीण होता. आता गावी जाऊन शेती करणार आहे.

टॅग्स :jailतुरुंगCourtन्यायालय