शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

आता पूर्वीसारखा पोलीस ठाण्यात भरणार जनता दरबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:57 IST

रविवार सोडून इतर दिवशी दररोज ३ ते ५ सर्व पोलीस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिक आणि पोलिसांमधील जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार पुन्हा घेण्यात येणार आहे. एखादी अनुचित घटना घडल्यावरही अनेक सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदाराला आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा अनुभव काही नागरिकांना अजूनही येतो.

मुंबई - सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे जागेवरच निरसन करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना दररोज ३ ते ५ जनता दरबार घेण्याच्या सूचना सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांना भेटण्यासाठीच्या वेळेची पाटी लावण्याचे आदेशही मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले आहेत. त्यामुळे रविवार सोडून इतर दिवशी दररोज ३ ते ५ सर्व पोलीस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे.

शहरातील नागरिक आणि पोलिसांमधील जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार पुन्हा घेण्यात येणार आहे. सत्यपाल सिंह हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना ते पोलीस ठाण्यात स्वतः हजार राहून जनता दरबार घेत. नागरिकांसाठी गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर असते. मात्र एखादी अनुचित घटना घडल्यावरही अनेक सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदाराला आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा अनुभव काही नागरिकांना अजूनही येतो. त्यामुळे पोलीस आणि सर्वसामान्य जनतेतील अंतर कमी होण्याची मदत या जनता दरबारामुळे होण्यास मदत होते. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई