शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

आता पूर्वीसारखा पोलीस ठाण्यात भरणार जनता दरबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:57 IST

रविवार सोडून इतर दिवशी दररोज ३ ते ५ सर्व पोलीस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिक आणि पोलिसांमधील जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार पुन्हा घेण्यात येणार आहे. एखादी अनुचित घटना घडल्यावरही अनेक सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदाराला आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा अनुभव काही नागरिकांना अजूनही येतो.

मुंबई - सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे जागेवरच निरसन करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना दररोज ३ ते ५ जनता दरबार घेण्याच्या सूचना सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांना भेटण्यासाठीच्या वेळेची पाटी लावण्याचे आदेशही मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले आहेत. त्यामुळे रविवार सोडून इतर दिवशी दररोज ३ ते ५ सर्व पोलीस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे.

शहरातील नागरिक आणि पोलिसांमधील जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार पुन्हा घेण्यात येणार आहे. सत्यपाल सिंह हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना ते पोलीस ठाण्यात स्वतः हजार राहून जनता दरबार घेत. नागरिकांसाठी गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर असते. मात्र एखादी अनुचित घटना घडल्यावरही अनेक सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदाराला आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा अनुभव काही नागरिकांना अजूनही येतो. त्यामुळे पोलीस आणि सर्वसामान्य जनतेतील अंतर कमी होण्याची मदत या जनता दरबारामुळे होण्यास मदत होते. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई