शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह; हुंड्यासाठी सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:42 IST

हुंड्याच्या लालसेपोटी सासरच्यांनी मुलीची हत्या करून मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार सुरू केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

बिहारमधील मोतिहारमध्ये एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या लालसेपोटी सासरच्यांनी मुलीची हत्या करून मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार सुरू केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या माहितीवरून ते स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांना पाहताच मुलीचे सासरचे लोक पळून गेले. 

कुटुंबीयांनी चितेतून अर्धवट जळालेला मृतदेह उचलला आणि हरसिद्धी अरेराज मुख्य रस्ता अडवला. सासरच्यांनी तिचे हातपाय बांधून गळा आवळून खून केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. फुलपरी देवी (20) असं मुलीचं नाव होतं. 

गरीब आईने मोठ्या कष्टाने आपल्या मुलीचे शिक्षण करून तिचे लग्न लावून दिले. मात्र हुंड्याच्या हव्यासाने तिचीही हत्या केली. मुलीची आई रामवती देवी यांनी सांगितले की, आपल्या मुलीचं लग्न 8 मार्च 2023 रोजी टोला गावातील रहिवासी सुभाष शर्मा यांचा मुलगा नितेश कुमार याच्याशी केले होते. लग्नानंतर त्यांची मुलगी सासरच्या घरी गेल्यापासून पाच लाख रुपये आणि बाईकसाठी तिचा छळ सुरू झाला. 

लग्नानंतर सहा महिन्यांनी नवऱ्याने तिला मारहाण करून आई-वडिलांच्या घरी पाठवले. काही वेळाने जावई नितेशकुमार आला आणि मुलीला घेऊन गेला. काही दिवसांनी मुलीवर अत्याचार करून तिला घराबाहेर हाकलून दिलं. आता माहिती मिळाली की मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला जात आहे. आम्हाला पाहताच सासरचे लोक तेथून पळून गेले. तेथे आम्ही चितेतून तिचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढला.

याप्रकरणी डीएसपी रंजन कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या आईकडून तक्रार मिळाली आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या मुलीचे हात पाय बांधून हत्या केली आहे. याप्रकरणी महिलेचा पती, सासू, सासरे यांच्यासह अनेकांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी