शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

२ मुलांसह आईचा संशयास्पद मृत्यू, जावयावर आरोप; सासऱ्याच्या पत्रानं गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:18 IST

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खूणा होत्या

नवी दिल्ली – दक्षिण पश्चिम दिल्लीच्या मुनिरकामध्ये रविवारी एका घरात महिला आणि तिच्या २ मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. मृत महिलेच्या मनगटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. मृत महिलेचे नाव वर्षा शर्मा असून तिच्या २ लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुनिरका येथे एका फ्लॅटमध्ये २७ वर्षीय विवाहिता वर्षा शर्मा आणि तिच्या अडीच वर्ष आणि ४ वर्षाच्या २ मुलांचा मृतदेह सापडला. वर्षाचा पती जोगेंद्र शर्मा हा नार्कोटिक्स डिपार्टंमेंटमध्ये कॉन्स्टेबल आहे. ही घटना ८ ऑक्टोबरची असून सकाळी १०.३० वाजता हा प्रकार समोर आला. मुनिरका भागातून पोलिसांना एक कॉल आला त्यात महिलेने घरात आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली.

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खूणा होत्या. प्राथमिकदृष्ट्या महिलेने आधी २ मुलांचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. परंतु यामागचं कारण काय? हे कुणालाही माहिती नव्हते. परंतु संध्याकाळी जेव्हा मृत महिलेच्या वडिलांनी ४ पानी तक्रार पोलिसांना सोपावली तेव्हा या घटनेमागचे रहस्य उलगडले. तक्रारीत मृत महिलेच्या वडिलांनी जावई जोगेंद्र आणि मुलगी वर्षाच्या नात्यावर भाष्य केले.

जावई जोगेंद्र हा तंत्रमंत्र, पूजापाठ, नशा करणे, मारहाण करून हुंड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होता असा गंभीर आरोप वडिलांनी केला. अद्याप मृत महिलेच्या वडिलांचा जबाब नोंदवणे बाकी आहे. जबाबानंतर पोलीस या घटनेत गुन्हा नोंद करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून क्राईम इन्वेस्टिगेशन टीम आणि एफएसएल टीम एकत्रितपणे फ्लॅटची तपासणी करणार आहे. वर्षाने आधी २ मुलांना मारले त्यानंतर आत्महत्या केली असावी असं प्रत्येकाला वाटतंय. तरीही पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तक्रारीत काय म्हटलंय?

लग्नानंतर जावई आणि त्याच्या घरातले हुंड्यासाठी वर्षाला त्रास देत होते. जोगेंद्र मुरादाबादला राहायचा. अनेकदा भांडणे झाल्यावर तो वर्षाला माहेरी दिल्लीला घेऊन यायचा. वर्षाने फोनवर सांगितले होते की, तिचा पती बाहेर नशेची औषधे खायला द्यायचा. जेव्हा ती शुद्धीत नसायची तेव्हा तिच्यावर तंत्र-मंत्र केले जायचे. हे एकदा नव्हे अनेकदा केले आहे. वर्षाच्या वडिलांनी जावयाला फोनवर विचारणा केली असता त्याने वर्षावर भूत चढलंय. ज्यामुळे पूजा-पाठ केला जात आहे असं जावई म्हणायचा. तसेच ही आत्महत्या नसून विचार करून केलेली हत्या आहे. जोगेंद्रने पत्नी आणि मुलांना मारले असा आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी