शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

२ मुलांसह आईचा संशयास्पद मृत्यू, जावयावर आरोप; सासऱ्याच्या पत्रानं गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:18 IST

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खूणा होत्या

नवी दिल्ली – दक्षिण पश्चिम दिल्लीच्या मुनिरकामध्ये रविवारी एका घरात महिला आणि तिच्या २ मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. मृत महिलेच्या मनगटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. मृत महिलेचे नाव वर्षा शर्मा असून तिच्या २ लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुनिरका येथे एका फ्लॅटमध्ये २७ वर्षीय विवाहिता वर्षा शर्मा आणि तिच्या अडीच वर्ष आणि ४ वर्षाच्या २ मुलांचा मृतदेह सापडला. वर्षाचा पती जोगेंद्र शर्मा हा नार्कोटिक्स डिपार्टंमेंटमध्ये कॉन्स्टेबल आहे. ही घटना ८ ऑक्टोबरची असून सकाळी १०.३० वाजता हा प्रकार समोर आला. मुनिरका भागातून पोलिसांना एक कॉल आला त्यात महिलेने घरात आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली.

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खूणा होत्या. प्राथमिकदृष्ट्या महिलेने आधी २ मुलांचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. परंतु यामागचं कारण काय? हे कुणालाही माहिती नव्हते. परंतु संध्याकाळी जेव्हा मृत महिलेच्या वडिलांनी ४ पानी तक्रार पोलिसांना सोपावली तेव्हा या घटनेमागचे रहस्य उलगडले. तक्रारीत मृत महिलेच्या वडिलांनी जावई जोगेंद्र आणि मुलगी वर्षाच्या नात्यावर भाष्य केले.

जावई जोगेंद्र हा तंत्रमंत्र, पूजापाठ, नशा करणे, मारहाण करून हुंड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होता असा गंभीर आरोप वडिलांनी केला. अद्याप मृत महिलेच्या वडिलांचा जबाब नोंदवणे बाकी आहे. जबाबानंतर पोलीस या घटनेत गुन्हा नोंद करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून क्राईम इन्वेस्टिगेशन टीम आणि एफएसएल टीम एकत्रितपणे फ्लॅटची तपासणी करणार आहे. वर्षाने आधी २ मुलांना मारले त्यानंतर आत्महत्या केली असावी असं प्रत्येकाला वाटतंय. तरीही पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तक्रारीत काय म्हटलंय?

लग्नानंतर जावई आणि त्याच्या घरातले हुंड्यासाठी वर्षाला त्रास देत होते. जोगेंद्र मुरादाबादला राहायचा. अनेकदा भांडणे झाल्यावर तो वर्षाला माहेरी दिल्लीला घेऊन यायचा. वर्षाने फोनवर सांगितले होते की, तिचा पती बाहेर नशेची औषधे खायला द्यायचा. जेव्हा ती शुद्धीत नसायची तेव्हा तिच्यावर तंत्र-मंत्र केले जायचे. हे एकदा नव्हे अनेकदा केले आहे. वर्षाच्या वडिलांनी जावयाला फोनवर विचारणा केली असता त्याने वर्षावर भूत चढलंय. ज्यामुळे पूजा-पाठ केला जात आहे असं जावई म्हणायचा. तसेच ही आत्महत्या नसून विचार करून केलेली हत्या आहे. जोगेंद्रने पत्नी आणि मुलांना मारले असा आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी