शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नवी मुंबई: पामबीचवरील फेरफटका बेतला दोघांच्या जीवावर

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 5, 2022 20:54 IST

वेगाने केला घात, सानपाडा येथील तिघांचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मजेसाठी पामबीच मार्गावर मोटरसायकलने फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तिघांच्या अपघाताची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून त्यात एक अल्पवयीन आहे. मोटारसायकल अति वेगात असल्याने नियंत्रण सुटून त्यांचा अपघात घडला. रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर सरसोळे लगत हा अपघात घडला आहे. बेलापूर कडून वाशीला जाणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली असता दुभाजकामध्ये तिघेजण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, मध्यरात्रीच्या सुमारास एकाला मृत घोषित करण्यात आले. तर सोमवारी सकाळी दुसऱ्या जखमीचा देखील मृत्यू झाला. तिसऱ्याची देखील प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राजा जाना (१६) व राजेश गुप्ता (३०) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर शवान मुल्ला (२१) य याच्यावर उपचार सुरु आहेत. तिघेही सानपाडा परिसरात राहणारे असून रविवारी रात्री सहज फेरफटका मारण्यासाठी मोटरसायकलने पामबीच मार्गावर गेले होते. सीवूड येथील चौकातून ते परत सानपाडाकडे वळले होते. यावेळी मोटरसायकल अति वेगात असल्याने सरसोळे येथे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल दुभाजकामधील झाडाला धडकून त्यांचा अपघात झाला. अपघातावेळी मोटरसायकल कोण चालवत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात