शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:37 IST

पोलिसांनी संशयाच्या आधारे मुस्कानला ताब्यात घेतले, खाकीचा धाक दाखवून तिला विचारले तेव्हा मुस्कानने सत्य बाहेर सांगितले.

नवी दिल्ली - अरहान आणि इनाया...अरहान ५ वर्षाचा तर त्याची बहीण इनायाचे वय १ वर्ष, दोघेही चिमुकले एकमेकांचा हात पकडून घराबाहेर खेळायचे. या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून कुणीही त्यांचे दु:ख सहज विसरून जाईल. परंतु या दोन कोवळ्या जीवांना काय माहिती होते, ज्याने त्यांना जन्म दिला ती आईच त्यांच्या मृत्यूचे कारण बनेल. आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या या दोन जीवांना संपवण्याचं पाप आईनेच केले आहे. 

१९ जून २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास पश्चिमी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये रुडकली तालाब अली या गावात एका घराबाहेर अजब गोंधळ दिसून आला. हे घर होते वसीम आणि त्याची पत्नी मुस्कान हिचे. बाहेर लोकांची गर्दी होती. घराच्या आतमध्ये खाटीवर २ मुलांचा मृतदेह होता. अरहान आणि इनाया हे जग सोडून गेले होते. आई धाय मोकलून रडत होती. सकाळी नाश्ता करून मुले झोपी गेली की परत उठलीच नाहीत. मुलांचे वडील कामासाठी चंदीगडला गेले होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मुलांच्या मृत्यूचा तपास सुरू केला.

आई मुस्कानची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली की, सकाळी मुलांना चहा बिस्किट आणि फरसाण खायला दिले. नाश्ता केल्यानंतर दोन्ही मुले झोपी गेले. काही वेळाने मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते उठलेच नाहीत. त्यांचा श्वास बंद झाला होता. या दोन्ही मुलांच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत. प्राथमिक तपासात एखादा विषारी पदार्थ खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांना वाटले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्याची तयारी केली परंतु आई मुस्काने त्यास नकार दिला. जेव्हा मुस्कानला विचारले तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. मग तिथेच पोलिसांच्या मनात शंका उपस्थित झाली. 

पोलिसांनी संशयाच्या आधारे मुस्कानला ताब्यात घेतले, खाकीचा धाक दाखवून तिला विचारले तेव्हा मुस्कानने सत्य बाहेर सांगितले. मुस्कानने सांगितलेला प्रकार ऐकून पोलीस अधिकारी हैराण झाले. या दोन मुलांचा जीव इतर कुणी नाही तर आई मुस्काननेच रसगुल्लामध्ये विष टाकून मुलांना खायला दिले आणि मारून टाकले होते. मुस्कानचे तिच्या आत्याच्या मुलासोबत अफेअर सुरू होते. जुनैद मुजफ्फरनगरच्या फिरोजाबाद परिसरात राहणारा आहे. काही वर्षापूर्वी मुस्कानचे लग्न वसीमसोबत झाले होते. त्या दोघांना अरहान आणि इनाया नावाची मुले होती. वसीम वेल्डिंगचे काम करत होता, त्यामुळे कामासाठी त्याला बऱ्याचदा बाहेर जायला लागायचे. जवळपास ३ वर्षाआधी मुस्कान आणि जुनैद पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले. या दोघांमध्ये जवळीक वाढली. 

निकाहसाठी जुनैदने ठेवली अट

जुनैद आणि मुस्कान दोघे पळून गेले होते. या दोघांना नातेवाईकांनी शोधले. मुलांकडे पाहून वसीमने मुस्कानला माफ केले परंतु कहाणी इथेच संपली नाही. वसीम जेव्हा बाहेर जायचा मुस्कान जुनैदला भेटायला बोलवायची. दोघांमध्ये अनैतिक संबंध इतके वाढले की दोघांनी निकाह करण्याचा निर्णय घेतला. निकाहनंतर हनीमूनला जाण्याचाही प्लॅन बनवला. परंतु निकाहसाठी जुनैदने एक अट ठेवली ती म्हणजे वसीमच्या दोन्ही मुलांना तो सांभाळणार नाही. मुस्कानला कुठल्याही किंमतीत जुनैदसोबत निकाह करायचा होता त्यामुळे तिने मुलांचा काटा काढण्याचा कट रचला. १९ जूनला वसीम कामानिमित्त बाहेर गेला तेव्हा तिने रसगुल्लामध्ये मुलांना विष घालून खायला दिले. त्यानंतर या दोन्ही निष्पाप मुलांचा जीव गेला. सध्या पोलिसांनी मुस्कानला ताब्यात घेतले असून तिचा प्रियकर जुनैद हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी