शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मृतदेह ड्रममध्ये भरून मुंबई - पुणे महामार्गावर झाडीत टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 00:38 IST

घणसोलीमध्ये राहणारे अंबुज तिवारी व नीलम तिवारी हे दोघे २२ जुलैला सायंकाळी घरातून अचानक गायब झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घणसोलीमधील नीलम तिवारी या महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून झाल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पती अंबुज तिवारी व त्याचा मित्र श्रीकांत चौबे याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी मृतदेह ड्रममध्ये भरून मुंबई - पुणे महामार्गावर झाडीमध्ये फेकून दिला होता.घणसोलीमध्ये राहणारे अंबुज तिवारी व नीलम तिवारी हे दोघे २२ जुलैला सायंकाळी घरातून अचानक गायब झाले होते. अंबुजच्या वडिलांनी याविषयी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये हलविल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांना २८ जुलैला अंबुज हा घणसोली परिसरात आढळला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीचा घणसोलीमधील मित्राच्या घरामध्ये ओढणीने गळा आवळून खून केल्याचे मान्य केले. चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचेही त्याने सांगितले. मृतदेह ड्रममध्ये भरून मित्र श्रीकांत चौबे याच्या टेम्पोमधून महामार्गावर खोपोलीजवळ झाडीत टाकला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून टेम्पोही जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपआयुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त विनायक वस्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी, सहायक पो. निरीक्षक तुकाराम निंबाळकर, प्रवीण फडतरे आदींच्या पथकाने केला.