शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरुन शिकाऊ डॉक्टरची हत्या; ४८ तासांत आरोपीला केलं गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 20:56 IST

एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक सुरेंद्र पाल (२४) रा. मेडिकल कॅम्पस याची मुलींच्या वसतिगृहाजवळच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली

यवतमाळ : संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण करणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्याच्या हत्येतील आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी दिलेला कबुलीजबाब त्याहीपेक्षा धक्कादायक आहे. डॉक्टरला दुचाकीचा कट लागल्यावरून वाद झाला. या वादात त्याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी शनिवारी सायंकाळी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.

एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक सुरेंद्र पाल (२४) रा. मेडिकल कॅम्पस याची मुलींच्या वसतिगृहाजवळच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात सुरुवातीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुषार शंकर नागदेवते (२४), आकाश दिलीप गोफणे (२१) दोघे रा. वाघापूर यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल पोलिसांना ठोस पुरावे हाती लागले नव्हते. त्यामुळे या घटनेचा तपास सुरूच होता. त्यासाठी सहा पथके गठित करण्यात आली.

यात यवतमाळ शहर, अवधूतवाडी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेलचा समावेश होता. जवळपास शंभर खबऱ्यांच्या माध्यमातून घटनेच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यात आली. सीडीआर, एसडीआर, डमडाटा याची पडताळणी केल्यानंतर मुख्य आरोपीचा शोध लागला. ऋषिकेश गुलाबराव सवळे (२३) रा. महावीरनगर, प्रवीण संजीव गुंडजवार (२४) रा. सावित्रीबाई फुले सोसायटी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, चाकू जप्त केला.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक डाॅ.के.ए. धरणे, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, नंदकिशोर पंत, सहायक निरीक्षक अमोल पुरी, गणेश वनारे, विवेक देशमुख, जनार्दन खंडेराव, योगेश रंधे, जमादार बंडू डांगे, नीलेश राठोड, बबलू चव्हाण, सलमान शेख, किशोर झेंडेकर, सुमित पाळेकर, अजय निंबोळकर, रोशनी जोगळेकर, गजानन क्षीरसागर, अमित कदम, मिलिंद दरेकर, नीलेश भुसे, अल्ताफ शेख यांनी केली.

तपास पथकाला एक लाखांचे बक्षीस

 

४८ तासात संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींना शस्त्रासह अटक केली. ही कारवाई करणाऱ्या पोलीस पथकांना एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी रोख एक लाख रुपयांचे बक्षीस, जीएसटी व सीनोट, गुड रिमार्क जाहीर केला.

अशी घडली घटना

तीनही आरोपी दुचाकीवरून दारूची खेप टाकून महाविद्यालय परिसरातून जात होते. त्यावेळी मुलींच्या वसतिगृहाजवळ दुचाकीचा अशोक पाल याला कट लागला. यावरून शाब्दिक वाद झाला. या वादातच आरोपीने अशोकच्या छातीत व पोटाच्या खाली वार केले. दोन्ही वार वर्मी लागल्याने अशोकचा जागीच मृत्यू झाला, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

त्रिपुरातील घटनेनंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन एसपी डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ