शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खून प्रकरणातील आरोपी जेरबंद, पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:13 IST

रुळे (ता. वेल्हा) येथील सागर खंडू निवंगुणे (वय ३२) या तरुणाच्या पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणातील फरारी झालेल्या ४ आरोपींना रविवारी (दि. २३) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

मार्गासनी - रुळे (ता. वेल्हा) येथील सागर खंडू निवंगुणे (वय ३२) या तरुणाच्या पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणातील फरारी झालेल्या ४ आरोपींना रविवारी (दि. २३) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. गुन्हा घडल्यानंतर ४८ तासांत आरोपींना जेरबंद केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.दिनांक २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वा. मौजे रुळे (ता. वेल्हे) येथील पिंगारा हॉटेलमध्ये आरोपी नवनाथ धाकू उघडे याची पत्नी, माजी सरपंच छाया उघडे या रुळे गावच्या सरपंच असताना ग्रामपंचायतीच्या कारभारात झालेला गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळा रोहिदास शेजवळ याने उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊन यापूर्वी तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील मयत सागर खंडू निवंगुणे हा रोहिदास शेजवळ याचा मित्र असून, त्याने ग्रामपंचायतीचा घोटाळा उघडकीस आणण्यास मदत केली होती. याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी कट रचून रामदास बबन निवंगुणे व सागर खंडू निवंगुणे हे दोघे जण पिंगारा हॉटेलमध्ये बसले असताना जीपमधून येऊन सागर निवंगुणे याच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्याचा खून केला. रामदास निवंगुणे यांनी याबाबत फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा घडल्यापासून आरोपी हे फरार झाले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरु, दिलीप जाधवर, दयानंद लिमण, चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाट, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, नीलेश कदम, अक्षय जावळे यांचे पथक कार्यरत झाले होते. रुळे व परिसरातील गावांमध्ये साध्या वेशात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे सिंहगड रोडने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने किरकटवाडी येथे सापळा रचून सी.डब्लू.पी.आर.एस. गेटसमोर आरोपी शंकर कोंडिबा उघडे (वय २५, रा.रुळे विठ्ठलवाडी ता.वेल्हे जि.पुणे), रवींद्र बाळू आखाडे (वय ३५, रा.नांदोशी ता.हवेली जि.पुणे), रोहित शंकर पासलकर(वय १९, रा.रुळे मोरदरी ता.वेल्हे जि.पुणे),विष्णू ऊर्फ इशा रामभाऊ उघडे (वय १८, रा.रुळे, विठ्ठलवाडी, ता.वेल्हे जि.पुणे) यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी पूर्वीचे भांडणावरुनच सागर निवंगुणे याच्या डोक्यात तलवार, कोयता व कटावणीने वार करुन त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.माजी सरपंच छाया उघडे या रुळे गावच्या सरपंच असताना ग्रामपंचायत कारभारातील गैरव्यवहार रोहिदास शेजवळ याने उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली होती.मयत सागर निवंगुणे यांनी शेजवळ यांना घोटाळा उघडकीस आणण्यास मदत केली होती. याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी कट रचून रामदास बबन निवंगुणे व सागर खंडू निवंगुणे हे दोघे जण पिंगारा हॉटेलमध्ये बसले असताना जीपमधून येऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्यात सागर मरण पावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी