शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या, ९ तास आरोपी मृतदेहासोबत राहिला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 19:55 IST

पोलिसांनी गेट तोडले तेव्हा २२ वर्षीय महिला बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले.

नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्या प्रकरण अजून ताजे असतानाच दिल्लीतील सरिता विहार परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आरोपी युवक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करून मृतदेह घरात डांबून फरार झाला. फरार होण्यापूर्वी त्याने सुमारे नऊ तास मृतदेहासोबत घालवले. एवढेच नाही तर दोन दिवस तो महिलेचा मृतदेह पाहण्यासाठी रात्री घरी येत होता. आरोपीने महिलेची हत्या तिच्या एक वर्षाच्या मुलीसमोर केली. 

हत्या केल्यानंतर आरोपीनं त्या मुलीला सोबत घेतले. महिलेचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. राहुल वर्माला महिलेशी लग्न करायचे होते. सरिता विहार पोलिसांनी आरोपी तरुणाला पाच दिवसांनंतर अटक केली. दक्षिण-पूर्व जिल्हा पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता विहार पोलिसांना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२५ वाजता कॉल आला. मदनपूर खादर येथील एका घरात एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडली असून घराला बाहेरून कुलूप असल्याची माहिती मिळाली. माहितीनंतर एसीपी जगदेव सिंग यांच्या देखरेखीखाली निरीक्षक ज्ञानेंद्र राणा, एसआय दीपक धांडा, एएसआय लियाकत अली आणि एएसआय रमेश कुमार यांच्या पथकाने घटनास्थळी जात तपास सुरू केला.

पोलीस पथकाला घटनास्थळी घरमालक परम बिधुरी हा भेटला. घराला बाहेरून कुलूप होते. पोलिसांनी गेट तोडले तेव्हा २२ वर्षीय महिला बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. परमने सांगितले की, २० दिवसांपूर्वी राहुल त्याच्या घरात भाड्याने राहायला आला होता. राहुलने त्याला फोन करून त्याची महिला मैत्रिण गुलशना घरात मृतावस्थेत पडल्याचे सांगितले होते. त्यावर पोलिसांनी राहुलचा भाऊ प्रवीण याच्याशी संपर्क साधला. राहुलचे कुटुंबही मदनपूर खादर येथे राहते. प्रवीणने सांगितले की, राहुल एका महिलेसोबत २० दिवसांपासून सहमतीने रिलेशनशिपमध्ये राहत होता. महिलेला एक वर्षाची मुलगीही आहे.

पोस्टमॉर्टममध्ये महिलेची हत्या झाल्याचे उघडगुलशनाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची कारवाई केली. एसआय दीपक धांडा यांनी एम्समध्ये महिलेचे पोस्टमार्टम केले. त्यानंतर गुलशनाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे. यानंतर एसआय दीपक धांडा, एएसआय लायक अली आणि रमेश कुमार यांच्या पथकाने महिलेच्या हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. एसीपी जगदेव सिंग यांनी वैयक्तिकरित्या तपासावर देखरेख केली. तपासाअंती पोलीस पथकाने १६ नोव्हेंबर रोजी राहुलला सरिता विहार जंगलातून त्याला अटक केली.

मृतदेह पाहण्यासाठी रात्री यायचादक्षिण-पूर्व जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राहुलला गुलशनाला संशय होता की तिचे कोणासोबत तरी अफेअर आहे. या मुद्द्यावरून त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. गुलशनाने त्याच्याकडे पाच हजार रुपये मागितले. या मुद्द्यावरून वाद झाला. या भांडणातून १० नोव्हेंबर रोजी दुपारी गुलशनाचा हाताने आणि ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर आरोपी रात्री दहा वाजेपर्यंत महिलेच्या एक वर्षाच्या मुलीसह मृतदेहाजवळ थांबला. रात्री दहा वाजता तो मुलीसह घरातून पळून गेला. त्यानंतर मुलीला दुसऱ्याकडे सोपवून तो पळाला. यानंतर आरोपी रात्री २ वाजता गुलशनाचा मृतदेह पाहण्यासाठी घरी आला. असाच तो २ दिवस येत राहिला. त्यानंतर त्याने घरमालकाला माहिती दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी