शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

तिघा रिक्षाचालकांनी केली दुचाकीस्वाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:57 IST

रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगणाऱ्या एका दुचाकीस्वारासह त्याच्या दोन मित्रांवर तिघा रिक्षाचालकांनी आपल्या दोन रिक्षाचालक साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत सोमवारी रात्री घडली.

कल्याण : रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगणाऱ्या एका दुचाकीस्वारासह त्याच्या दोन मित्रांवर तिघा रिक्षाचालकांनी आपल्या दोन रिक्षाचालक साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतीक गावडे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, त्याच्या दोन जखमी मित्रांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डोंबिवली पूर्वेतील दावडीनाका परिसरातून गावडे हा बाली जयस्वाल, निलेश भुणे या मित्रांसह दुचाकीवरून जात होता. यावेळी, रिक्षाचालक रवी लगाडेची रिक्षा रस्त्यात उभी होती. त्यामुळे प्रतीकने त्याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. यावरून रवी आणि प्रतिकमध्ये वाद झाला. रवीने ही बाब शेलार नाका येथे राहणारा रिक्षामालक रमेश उर्फ झांगºया याला सांगितली. यावेळी, रमेशने प्रतीकसह त्याच्या मित्रांना शेलारनाका येथे बोलावल्याने तिघेही शेलारनाका येथे रात्री ११.३० च्या सुमारास आले. तेथे यांच्यामध्ये पुन्हा झालेल्या वादातून रमेशसह रवी आणि चंद्या जमादार यांनी आपल्याकडील चॉपरने प्रतीक व त्याच्या दोघा मित्रांवर हल्ला केला.या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी, गंभीर जखमी झालेल्या प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून रमेश, चंद्या आणि रवीविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.गुन्हेगारी वाढली; कारवाईची मागणीडोंबिवलीत घडलेल्या या हत्येमुळे रिक्षाचालकांच्या मुजोरीबरोबरच आता त्यांची गुन्हेगारी वृत्तीही पुन्हा उघडकीस आली आहे. रात्री-अपरात्री हत्यारे घेऊन फिरणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी या प्रकरणानंतर जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी