शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीटेकच्या विद्यार्थ्याला पळवून पळवून मारलं; चाकूनं २० वार करत संपवलं; कॉलेजमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:31 IST

मुलीच्या प्रकरणातून सुरू झालेल्या संघर्षाचा रक्तरंजित शेवट; संपूर्ण कॉलेज हादरलं

मेरठ: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील महाविद्यालयात बीटेकच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. गुंडांनी आधी विद्यार्थ्याला पळवून पळवून मारलं. त्यानंतर चाकूनं २० वेळा सपासप वार करून त्याला संपवलं. या घटनेनंतर महाविद्यालयात खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठून मुख्य आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेतलं. 

मेरठमधील एमआयईटी इन्स्टिट्यूटमध्ये बुधवारी वरच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या निखिल तोमरची चाकूनं भोसकून हत्या केली. या हल्ल्यात निखिलचा मित्र आर्यन जखमी झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी अभिषेक शर्मासह चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. एका मुलीवरून दोन गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासातून दिली.

एमआयईटी इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी दहाच्या सुमारास विद्यार्थी वर्गात जात होते. बागपत जिल्ह्याच्या शिकोहपूर गावचा रहिवासी असलेला निखिल काही विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालय परिसरात बोलत उभा होता. बीटेकच्या तिसऱ्या वर्गात शिकणारे अभिषेक वर्मा, अंकित शर्मा, विभोर यांच्यासह काही जण तिथे पोहोचले. त्यांनी निखिलला घेरलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिषेकनं निखिलच्या छाती, पोट, मान आणि डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.

निखिल आरडाओरड करत काही अंतर धावला. मात्र बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याचा आक्रोश ऐकून महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक तिथे पोहोचले. त्यांनी अभिषेक आणि त्याच्या तीन मित्रांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून निखिलला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. निखिलच्या शरीरावर चाकूनं २० वार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.