शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

बीटेकच्या विद्यार्थ्याला पळवून पळवून मारलं; चाकूनं २० वार करत संपवलं; कॉलेजमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:31 IST

मुलीच्या प्रकरणातून सुरू झालेल्या संघर्षाचा रक्तरंजित शेवट; संपूर्ण कॉलेज हादरलं

मेरठ: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील महाविद्यालयात बीटेकच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. गुंडांनी आधी विद्यार्थ्याला पळवून पळवून मारलं. त्यानंतर चाकूनं २० वेळा सपासप वार करून त्याला संपवलं. या घटनेनंतर महाविद्यालयात खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठून मुख्य आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेतलं. 

मेरठमधील एमआयईटी इन्स्टिट्यूटमध्ये बुधवारी वरच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या निखिल तोमरची चाकूनं भोसकून हत्या केली. या हल्ल्यात निखिलचा मित्र आर्यन जखमी झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी अभिषेक शर्मासह चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. एका मुलीवरून दोन गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासातून दिली.

एमआयईटी इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी दहाच्या सुमारास विद्यार्थी वर्गात जात होते. बागपत जिल्ह्याच्या शिकोहपूर गावचा रहिवासी असलेला निखिल काही विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालय परिसरात बोलत उभा होता. बीटेकच्या तिसऱ्या वर्गात शिकणारे अभिषेक वर्मा, अंकित शर्मा, विभोर यांच्यासह काही जण तिथे पोहोचले. त्यांनी निखिलला घेरलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिषेकनं निखिलच्या छाती, पोट, मान आणि डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.

निखिल आरडाओरड करत काही अंतर धावला. मात्र बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याचा आक्रोश ऐकून महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक तिथे पोहोचले. त्यांनी अभिषेक आणि त्याच्या तीन मित्रांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून निखिलला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. निखिलच्या शरीरावर चाकूनं २० वार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.