शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला 

By पूनम अपराज | Updated: September 30, 2020 14:31 IST

पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. 

ठळक मुद्देकाल पायल आपल्या वकिलांसोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटली असून तिने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली होती.

लैंगिक शोषणाच्या आरोपाचा सामना करत असलेल्या बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यपला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. अभिनेत्री पायल घोषनेअनुराग कश्यपविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाबद्दल गुन्हा दाखल केला होता. पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. 

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले पायल घोषच्या लढाईत आवाज उठवत आहेत. आठवले यांनी मुंबई पोलिसांना अनुराग कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर मुंबई पोलिसांनी लवकरच अनुराग कश्यपला अटक केली नाही तर ते धरणे आंदोलनाला बसतील. दरम्यान, आता पोलिस अनुराग कश्यप यांना समन्स पाठवून चौकशी करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. पायल घोष अनेक दिवसांपासून न्यायाची मागणी करत होती. पायल घोष हिने इशारा दिला होता की, जर तिला न्याय मिळाला नाही तर ती उपोषणाला बसणार आहे. दिग्दर्शकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. तसेच काल पायल आपल्या वकिलांसोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटली असून तिने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली होती. पायलचे आरोप अनुराग कश्यप यांनी फेटाळले. त्याने ट्विट करुन आपला मुद्दा मांडला. त्याने लिहिले की, , मला शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी इतका वेळ घ्यावा लागला. चला, काही नाही. मला गप्प बसवताना एक महिला असूनही तिने देखील एका महिलेचा आधार घेतला. थोडीतरी मर्यादा पाळा मॅडम, फक्त असे म्हणेन की तुमचे सर्व आरोप निराधार आहेत,  अशी माहिती अमर उजालाने दिली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळpayal ghoshपायल घोषAnurag Kashyapअनुराग कश्यपMumbaiमुंबईPoliceपोलिस