शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रेयसीच्या पतीचा मृतदेह 2 दिवस जंगलात जाळत होता प्रियकर, असा झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:31 IST

Crime News : प्रकरणाची चौकशी करण्यादरम्यान पोलिसांना मोनूच्या पत्नीवर संशय आला. तिची चौकशी केली गेली तेव्हा तिने लव्ह अफेअरमध्ये पतीची हत्या केल्याचं कबूल केलं.

Crime News : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भिंडमध्ये एका प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जंगलात नेऊन दोन दिवस जाळला. नंतर पुरावे मिटवण्यासाठी मृतदेहाचे अवशेष चंबल नदीमध्ये फेकले. पण चौकशी दरम्यान मृत व्यक्तीच्या पत्नीवर पोलिसांना संशय आला होता.

कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पत्नीच्या प्रियकरासहीत 5 लोकांना अटक केली आहे. कोट परोसा गावात राहणारा मोनू 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. परिवारातील लोकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. 

प्रकरणाची चौकशी करण्यादरम्यान पोलिसांना मोनूच्या पत्नीवर संशय आला. तिची चौकशी केली गेली तेव्हा तिने लव्ह अफेअरमध्ये पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी रेखाच्या सांगण्यावरून प्रियकर आणि इतर लोकांना अटक केली.

चौकशीतून समोर आलं की, मोनूचं लग्न रेखा तोमरसोबत झालं होतं. पण रेखा लग्नाच्या आधीपासून अनुरागवर प्रेम करत होती. रेखाने आपल्या हातावर अनुरागचा A सुद्धा गोंदवला होता. यावरून रेखा आणि तिचा पती मोनूमध्ये नेहमीच भांडण होत होतं. 

रेखाला तिचं पहिलं प्रेम हवं होतं त्यामुळे तिने रोजच्या भांडणाला नेहमीचं संपवण्यासाठी प्लान केला. यात तिला तिचा प्रियकर आणि काही लोकांनी मदत केली.

रेखाचा पती मोनू काही दिवसांसाठी भिंडमधून बाहेर गेला होता. 9 फेब्रुवारीला रेखाचा पती परत येणार होता तेव्हा याची सगळी माहिती रेखाने अनुरागला दिली होती. अनुरागने प्लान केला आणि ग्वाल्हेर स्टेशनवर पोहोचला.

इथे मोनू जसा रेल्वेतून उतरला आणि भिंडला जाण्यासाठी बसमध्ये बसला तेव्हा अनुरागही त्या बसमध्ये चढला. अनुरागने मोनूसोबत संवाद साधला आणि मैत्री केली. अनुरागने मोनूला विश्वास दिला की, तो कारने मेहगांववरून मुरैना जात आहे. रस्त्यात येणाऱ्या मोनूच्या गावाला तो त्याला सोडून देईल. 

मोनूनेही अनुरागवर विश्वास ठेवत त्याच्या कारमध्ये बसला. त्यानंतर अनुरागने आपल्या तीन साथीदारांसोबत मिळून मोनूचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मोनूचा मृतदेह पांडरीच्या जंगलात नेऊन जाळला. 

अनुराग दुसऱ्या दिवशी जंगलात पोहोचला आणि त्याने पुन्हा एकदा मोनूचा मृतदेह जाळला. त्यानंतर मृतदेहाचे अवशेष चंबलच्या नदीमध्ये नेऊन फेकले. पोलिसांनी अनुराग आणि मृतकाच्या पत्नीसहीत 5 आरोपींना अटक केली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी