शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिला, तरूणाने उचललं हे धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:21 IST

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं.

प्रेयसीसोबतचं लग्न फिसकटल्याने तणावात असलेल्या तरूणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजमध्ये असताना तरूणीसोबत मैत्री आणि नंतर प्रेम झालं. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरू होती. पण अचानक तरूणीने संपर्क तोडला. त्यामुळे एकाएकी धक्का बसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठीच्या तयारीसाठी तो इंदुरला जाण्यासही तयार होता. त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी इंदूरला पाठवलं. काही दिवसांत त्याची बहिणदेखील शिक्षणासाठी इंदूरला आली आणि ते दोघं एकाच घरात राहून शिक्षण पूर्ण करत होते. (हे पण वाचा : "मी तिला विसरू शकत नाही..."; सुसाईड नोट लिहून पतीनं स्मशानभूमीतच घेतला गळफास)

इंदुरला शिकत असताना राजेशची ओळख कॉलेजमधील एका तरूणीशी झाली. नंतर प्रेम आणि लग्नाची बोलणीही सुरू होती. आपल्या आवडत्या मुलीसोबत लग्न होणार असल्याने राजेश आनंदी होता. पण तरूणीने अचानक राजेशसोबतचा संपर्क तोडला. त्याला भेटणंही ती टाळत होती. यामुळे तो तणावात होता. 

रिपोर्टनुसार, आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याच्या प्रेमप्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मात्र त्यातील तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केला नाही. बुधवारी राजेश आणि त्याची बहिण जेवण करून झोपले होते. बहिणीला सकाळी जाग आली, तेव्हा समोर जे दिसलं ते पाहून बहिणीला धक्का बसला. तिला राजेशचा छताला लटकणारा मृतदेह दिसला.  तिनं तातडीनं पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश