शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भट्टीत जाळून हत्या करण्यात आलेला 'तो' जिवंत सापडला; घटनाक्रम ऐकून पोलिसांना धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:18 IST

६ महिन्यांपूर्वी स्वत:ला जिवंत जाळून घेणारा पोलिसांना जिवंत सापडला

मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. स्वत:ला भट्टीत जिवंत जाळणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकून पोलिसांनी हत्येचं षडयंत्र उघडकीस आणलं. एसएसपी बबूल कुमार यांनी पत्रकार परिषद घेत घडलेला घटनाक्रम सांगितला. 

१५ ऑगस्ट २०२१ रोजी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या भटावली गावच्या चेतरामन यांनी त्यांचा मुलगा जयवीरच्या हत्येची तक्रार दाखल केली. जयवीरला भट्टीत जाळण्या आलं. त्यानंतर त्याचा मृतदेह गायब करण्यात आल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली. चेतराम यांनी जयवीरच्या सासरच्या मंडळींबद्दल संशय व्यक्त केला. त्यामुळे शांती नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या तुलाराम, शांती देवी, विक्रम सिंह, राजू सिंह आणि सुमन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.

या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी जयवीरला जिवंत पकडत हत्येचं षडयंत्र उघडकीस आणलं. पत्नी आणि सासरच्या मंडळींना तुरुंगात पाठवण्यासाठी वडिलांच्या मदतीनं जयवीरनं संपूर्ण कट रचला होता. त्यासाठीच भट्टीत स्वत:ला जाळून मृतदेह गायब करण्याची कहाणी रचण्यात आली. सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आरोपीला गोव्यातून अटक केली. 

आरोपी जयवीर आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होता. त्यामुळे पत्नी आणि सासरच्या लोकांना खोट्या खटल्यात अडकवण्याची योजना जयवीरनं आखली. षडयंत्राचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी जयवीर आणि त्याच्या वडिलांना बेड्या ठोकल्या. यामध्ये जयवीरच्या भावाचादेखील समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालादेखील अटक केली.