शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीचे ‘मिसिंग’ पोलिसांकडून दुर्लक्षित?, प्रेमात हत्या, आत्महत्या प्रकरण 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 19, 2024 13:03 IST

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तपासात स्थानिक पोलिसांवर अपयशाचा ठपका बसला आहे. तरुणीची मिसिंग दाखल झाल्यानंतर जर कळंबोली पोलिसांकडून गांभीर्याने तपास झाला असता, तर वेळीच गुन्हा उघडकीस आला असता. परंतु २० दिवसांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर केवळ सीसीटीव्हीच्या आधारे हाती लागलेल्या माहितीवरून त्यांनी गुन्हा उघडकीस आणला.

बेपत्ता तरुण, तरुणींच्या तपासात स्थानिक पोलिस चालढकल करत असल्याचे किंवा अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तरुण, तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर अनेकदा प्रकरण हलक्यात घेतले जाते. ते इच्छेने कुठेतरी पळून गेले असावेत, असा अंदाज लावत केवळ मोबाइलद्वारे तपासावर भर दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी पुढील तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपवला जातो.

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. १२ डिसेंबरपासून ते ६ जानेवारीपर्यंत कळंबोली पोलिसांना तिच्या तपासात काहीच धागेदोरे हाती न लागल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र गुन्हे शाखेकडे तपास वर्ग होताच सहायक निरीक्षक नीलम पवार यांनी थेट वैष्णवी शिकत असलेले सायन येथील कॉलेज गाठले. 

...तर सहज उलगडा झाला असता    त्यांच्या पथकाने १२ डिसेंबरचे सीसीटीव्ही तपासले असता ती तरुणासोबत जाताना दिसून आली.     यामुळे दोघेही गेलेल्या मार्गाचा आढावा घेतला असता, खारघर स्थानकात व पुढे टेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर दोघे सीसीटीव्हीत दिसून आले.     जर कळंबोली पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले असते तर इथपर्यंतचा उलगडा सहज झाला असता.     प्रत्यक्षात मात्र त्यांचे हात तपासात तोकडे पडल्याने गुन्हा उघड होण्यास महिन्याचा कालावधी लागला.     वैष्णवीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने कुटुंबीयांना अंतिम मुखदर्शन घेता आले नाही. 

मोबाइलचे गूढ कायमगुन्हे शाखा पोलिस सीसीटीव्हीद्वारे टेकडीपर्यंत पोहचले असता, पुढील तपासासाठीदेखील सहायक निरीक्षक नीलम पवार यांच्या पथकाने कसोटीचे प्रयत्न केले. त्यामध्ये सांकेतिक अंकाचा उलगडा करून अखेर पाचव्या दिवशी मृतदेह शोधून काढला. दरम्यान, वैभव बुरुंगले (२४) याने जुईनगर रेल्वेस्थानकालगत आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी मोबाइल आढळून आल्याचे वाशी रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मोबाइल मिळाल्यानंतर तो न तपासता जप्तीत ठेवला होता. तर वैष्णवीचा मोबाइल अद्याप मिळाला नसल्याने त्याबाबतचे गूढ कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी