शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘त्या’ तरुणीचे ‘मिसिंग’ पोलिसांकडून दुर्लक्षित?, प्रेमात हत्या, आत्महत्या प्रकरण 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 19, 2024 13:03 IST

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तपासात स्थानिक पोलिसांवर अपयशाचा ठपका बसला आहे. तरुणीची मिसिंग दाखल झाल्यानंतर जर कळंबोली पोलिसांकडून गांभीर्याने तपास झाला असता, तर वेळीच गुन्हा उघडकीस आला असता. परंतु २० दिवसांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर केवळ सीसीटीव्हीच्या आधारे हाती लागलेल्या माहितीवरून त्यांनी गुन्हा उघडकीस आणला.

बेपत्ता तरुण, तरुणींच्या तपासात स्थानिक पोलिस चालढकल करत असल्याचे किंवा अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तरुण, तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर अनेकदा प्रकरण हलक्यात घेतले जाते. ते इच्छेने कुठेतरी पळून गेले असावेत, असा अंदाज लावत केवळ मोबाइलद्वारे तपासावर भर दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी पुढील तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपवला जातो.

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. १२ डिसेंबरपासून ते ६ जानेवारीपर्यंत कळंबोली पोलिसांना तिच्या तपासात काहीच धागेदोरे हाती न लागल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र गुन्हे शाखेकडे तपास वर्ग होताच सहायक निरीक्षक नीलम पवार यांनी थेट वैष्णवी शिकत असलेले सायन येथील कॉलेज गाठले. 

...तर सहज उलगडा झाला असता    त्यांच्या पथकाने १२ डिसेंबरचे सीसीटीव्ही तपासले असता ती तरुणासोबत जाताना दिसून आली.     यामुळे दोघेही गेलेल्या मार्गाचा आढावा घेतला असता, खारघर स्थानकात व पुढे टेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर दोघे सीसीटीव्हीत दिसून आले.     जर कळंबोली पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले असते तर इथपर्यंतचा उलगडा सहज झाला असता.     प्रत्यक्षात मात्र त्यांचे हात तपासात तोकडे पडल्याने गुन्हा उघड होण्यास महिन्याचा कालावधी लागला.     वैष्णवीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने कुटुंबीयांना अंतिम मुखदर्शन घेता आले नाही. 

मोबाइलचे गूढ कायमगुन्हे शाखा पोलिस सीसीटीव्हीद्वारे टेकडीपर्यंत पोहचले असता, पुढील तपासासाठीदेखील सहायक निरीक्षक नीलम पवार यांच्या पथकाने कसोटीचे प्रयत्न केले. त्यामध्ये सांकेतिक अंकाचा उलगडा करून अखेर पाचव्या दिवशी मृतदेह शोधून काढला. दरम्यान, वैभव बुरुंगले (२४) याने जुईनगर रेल्वेस्थानकालगत आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी मोबाइल आढळून आल्याचे वाशी रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मोबाइल मिळाल्यानंतर तो न तपासता जप्तीत ठेवला होता. तर वैष्णवीचा मोबाइल अद्याप मिळाला नसल्याने त्याबाबतचे गूढ कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी