शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धक्कादायक! प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, नंतर जंगलात फेकले, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:39 IST

mehrauli murder case : कहाणीची सुरुवात माया नगरी मुंबईत होते, जिथे कॉल सेंटरमध्ये काम करत असताना आफताब आणि श्रद्धा नावाची मुलगी भेटली.

मुंबईच्या कॉल सेंटरमध्ये दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात इतके अडकले की, घरच्यांनी विरोध केल्यावर ते दिल्लीला पळून गेले, पण एके दिवशी भांडण झाले आणि मुलाने मुलीच्या शरीराचे 35 तुकडे केले. हत्येची ही खळबळजनक घटना दिल्लीतील मेहरौली परिसरातून समोर आली आहे. हत्येची ही कहाणी 6 महिन्यांपूर्वीची आहे आणि यामध्ये आफताब असे आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

कहाणीची सुरुवात माया नगरी मुंबईत होते, जिथे कॉल सेंटरमध्ये काम करत असताना आफताब आणि श्रद्धा नावाची मुलगी भेटली. दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, त्यानंतर कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात श्रद्धाच्या वडिलांनी दिल्लीतील मेहरौली पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या अपहरणाची एफआयआर दाखल केली होती. श्रद्धाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांची मुलगी मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती, तिथे तिची आफताब नावाच्या व्यक्तीशी भेट झाली आणि त्यांची मैत्री खूप घट्ट झाली. त्यामुळे तो आनंदी नव्हता त्यामुळे त्याने याला विरोध केला. 

या विरोधामुळे त्यांची मुलगी आणि आफताब मुंबई सोडून दिल्लीत आले आणि येथे छतरपूर परिसरात राहू लागले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मुलीचा फोटो वगैरे पाहत असत, मात्र अनेक दिवस सोशल मीडियावर अपडेट न आल्याने त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवत त्यांनी छतरपूर भागातील त्यांची मुलगी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोहोचले, मात्र तेथे तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. तेथे गेटला कुलूप होते, त्यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. 

श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी माहिती देणाऱ्या आणि टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने आफताबचा शोध सुरू केला, त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आफताबला पकडण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत होती, त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. या गोष्टींना कंटाळून मे महिन्यात त्याचा निर्घृण खून करून मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात फेकून दिले. 

पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी आरोपी आफताब आणि श्रद्धा यांच्यात भांडण झाले होते. भांडणाच्या वेळी श्रद्धा आरडाओरडा करत होती, शेजारच्या लोकांना तिचा आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे आरोपी आफताब याने श्रद्धाचे तोंड दाबले आणि याच दरम्यान श्रद्धाचा मृत्यू झाला. श्रद्धाला मृत पाहून आफताब घाबरला, त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला आणि करवतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे केले.

18 दिवस मृतदेहाचे तुकडे फेकत होतापोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून 18 दिवस मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले. आरोपी इतका हुशार होता की, श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचे घाण वास येऊ नये म्हणून त्याने बाजारातून एक मोठा फ्रीज आणला आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे एका पिशवीत घेऊन मेहरौलीच्या जंगलात जायचा आणि तिथे पिशवीतून ते बाहेर फेकून देई, जेणेकरून जनावरे तिच्या मृतदेहाचे तुकडे खातील आणि आपण पकडले जाणार नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर