शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

धक्कादायक! प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, नंतर जंगलात फेकले, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:39 IST

mehrauli murder case : कहाणीची सुरुवात माया नगरी मुंबईत होते, जिथे कॉल सेंटरमध्ये काम करत असताना आफताब आणि श्रद्धा नावाची मुलगी भेटली.

मुंबईच्या कॉल सेंटरमध्ये दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात इतके अडकले की, घरच्यांनी विरोध केल्यावर ते दिल्लीला पळून गेले, पण एके दिवशी भांडण झाले आणि मुलाने मुलीच्या शरीराचे 35 तुकडे केले. हत्येची ही खळबळजनक घटना दिल्लीतील मेहरौली परिसरातून समोर आली आहे. हत्येची ही कहाणी 6 महिन्यांपूर्वीची आहे आणि यामध्ये आफताब असे आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

कहाणीची सुरुवात माया नगरी मुंबईत होते, जिथे कॉल सेंटरमध्ये काम करत असताना आफताब आणि श्रद्धा नावाची मुलगी भेटली. दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, त्यानंतर कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात श्रद्धाच्या वडिलांनी दिल्लीतील मेहरौली पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या अपहरणाची एफआयआर दाखल केली होती. श्रद्धाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांची मुलगी मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती, तिथे तिची आफताब नावाच्या व्यक्तीशी भेट झाली आणि त्यांची मैत्री खूप घट्ट झाली. त्यामुळे तो आनंदी नव्हता त्यामुळे त्याने याला विरोध केला. 

या विरोधामुळे त्यांची मुलगी आणि आफताब मुंबई सोडून दिल्लीत आले आणि येथे छतरपूर परिसरात राहू लागले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मुलीचा फोटो वगैरे पाहत असत, मात्र अनेक दिवस सोशल मीडियावर अपडेट न आल्याने त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवत त्यांनी छतरपूर भागातील त्यांची मुलगी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोहोचले, मात्र तेथे तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. तेथे गेटला कुलूप होते, त्यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. 

श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी माहिती देणाऱ्या आणि टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने आफताबचा शोध सुरू केला, त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आफताबला पकडण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत होती, त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. या गोष्टींना कंटाळून मे महिन्यात त्याचा निर्घृण खून करून मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात फेकून दिले. 

पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी आरोपी आफताब आणि श्रद्धा यांच्यात भांडण झाले होते. भांडणाच्या वेळी श्रद्धा आरडाओरडा करत होती, शेजारच्या लोकांना तिचा आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे आरोपी आफताब याने श्रद्धाचे तोंड दाबले आणि याच दरम्यान श्रद्धाचा मृत्यू झाला. श्रद्धाला मृत पाहून आफताब घाबरला, त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला आणि करवतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे केले.

18 दिवस मृतदेहाचे तुकडे फेकत होतापोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून 18 दिवस मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले. आरोपी इतका हुशार होता की, श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचे घाण वास येऊ नये म्हणून त्याने बाजारातून एक मोठा फ्रीज आणला आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे एका पिशवीत घेऊन मेहरौलीच्या जंगलात जायचा आणि तिथे पिशवीतून ते बाहेर फेकून देई, जेणेकरून जनावरे तिच्या मृतदेहाचे तुकडे खातील आणि आपण पकडले जाणार नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर