शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:52 IST

महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत.

ठळक मुद्देचार दिवसांत उलगडा करू : पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौरसंदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत. या प्रकरणाशी संबंधित अनेक कड्या जुळविण्यात आम्हाला यश आले आहे. तीन ते चार दिवसांत प्रकरणाचा उलगडा करण्यात आम्ही यशस्वी ठरू, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज व्यक्त केला. संपलेल्या वर्षांत नागपूर पोलिसांनी काय कामगिरी केली, कोणते उपक्रम राबविले, त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी त्यांनी पोलीस जिमखान्यात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. त्याचे पडसाद विधीमंडळाच्या सभागृहातही उमटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांना आपल्या कक्षात बोलवून या घटनेची माहिती जाणून घेतली तसेच आरोपींचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस आयुक्तांशी चर्चा करून गोळीबार करणा-या आरोपीच्या मुसक्या बांधण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी १० पथके या प्रकरणाच्या तपासात गुंतवली होती. आरोपींचा छडा लावण्यासाठी आम्ही घटनास्थळ, आजुबाजुचा परिसर, महापौर जोशी यांचे निवासस्थान तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मोबाईल टॉवर नेटवर्कचा वापर करून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न चालविले. दुसरीकडे त्यांना मिळालेल्या धमकी पत्राच्या पेट्यांकडेही लक्ष वेधून तपासाच्या कड्या जुळवल्या. आतापर्यंतच्या तपासात ५०० पेक्षा जास्त जणांची आम्ही चौकशी केली. त्यातील ६ जणांवर आमची नजर स्थिरावली आहे. त्यातील काही जण धमकी पत्र पेटीत टाकणारांपैकी असल्याचा संशय आहे. एक संशयीत बाहेर आहे. त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. गोळीबाराचे आरोपी शोधून काढणे हे आमच्यासाठी आव्हान नव्हे तर प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यासंबंधाने रात्रंदिवस प्रयत्न सुरू असून अनेक कड्या जुळल्या आहेत.त्याच आधारे तीन ते चार दिवसांत प्रकरणाचा उलगडा करण्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास असल्याचे डॉ. उपाध्याय म्हणाले.आहिस्ते कदम चलावे लागेलहा गोळीबाराच्या संबंधाने पत्रकारांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तरे देताना गोळीबार झाला अन् आरोपींनी कारवर तीन गोळ्या झाडल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुमच्या एवढीच पोलिसांनाही उत्सुकता आहे. त्यामुळे तपास प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आहिस्ते कदम चलावे लागेल, असेही आयुक्त म्हणाले. प्रकरण थेट महापौरांशी संबंधित आहे. त्याचा शक्य तेवढ्या लवकर छडा लावण्यासाठी कसोशिचे प्रयत्न सुरू आहे. यात कसलीही गडबड करणे योग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMayorमहापौरSandip Joshiसंदीप जोशीFiringगोळीबार