शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

महारयतने घातला गंडा; राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांची ७० कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:33 IST

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रोड्यूस वाँरन्टवर दोघांना कोल्हापूर येथून घेतले ताब्यात

अमरावती : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीने राज्यभरातील पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे. अमरावती येथील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रोड्यूस वाँरन्टवर सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा.इस्लामपूर, जि. सांगली) या दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना अमरावती येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महारयतचा संचालक सुधीर माहिते याने सहकारी संदीप मोहिते याच्या मदतीने राज्यभरातील अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात स्टॉल लावले होते. त्यांच्या कंपनीत ५२५ कर्मचारी कार्यरत होते. त्यांच्या माध्यमातून या कंपनीशी राज्यभरातील अनेक शेतकरी जुळले. १०० कडकनाथ कोंबड्यांमागे तब्बल ३ लाख १५ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची हमी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. पक्षी व अंडी आम्हीच खरेदी करू, असेही सांगितले होते. मात्र, कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुविधा अथवा कोंबड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतक-यांकडील कोंबड्या दगावल्या.अंडी कुचकामी ठरली; ती फेकून द्यावी लागली. ही फसवणूक पाहता राज्यभरातील शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रारी नोंदविल्या. या कंपनींच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांविरुद्ध राज्यभरात ११ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व अमरावती शहर तसेच ग्रामीण भागात हे गुन्हा नोंदविण्यात आले आहे. तब्बल पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटींनी फसवणूक झाल्याचा अंदाज पोलीस चौकशीत पुढे आला आहे. अमरावती पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नाहीतराज्यभरातील शेतकऱ्यांना गंडा घालणारे आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नावाने प्रसिद्धीस आले असले तरी ते एकमेकांचे भाऊ नाहीत. मोहितेवाडीत राहणारे असल्यामुळे या दोघांना ‘मोहिते बंधू’ म्हणून ओळखले जात आहे. ते केवळ कोंबडीपालन व्यवसायात खाद्य पुरवठादार आहेत. 

कोट्यवधींची संपत्ती जप्तआर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस हवालदार राजेश शेंडे, शैलेश रोंघे, दीपक धोटे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची इस्लामपुरातील अंडी उबवण केंद्रातील मशीनरी, तीन महागडी वाहने जप्त केली. आणखी मालमत्ता उघड करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे. 

अमरावतीमधील दहा शेतकऱ्यांची फसवणूकजगदीश कृष्णराव कुचे (३५, रा.शिवार्पण कॉलनी), प्रमोद भाऊराव ठाकरे (४५, रा. अभियंता कॉलनी) व दीपक देवीदास कोहळे (४२, रा.गाडगेनगर) या शेतकºयांनी सदर कंपनीत ५ लाख ३० हजार रुपये गुंतविले होते. त्यांनी फसवणुकीची तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी जिल्हाभरातील दहा शेतकऱ्यांची १७ लाख १५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारी