शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अरे देवा! लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने तुफान राडा; दगडफेकीत 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 16:32 IST

लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली.

झारखंडमधील गिरिडीहमध्ये एका लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गिरिडीहच्या मुफस्सिल पोलीस स्टेशन हद्दीतील पतरोडीह सेंट्रलपीठ येथे रात्री काही तरुणांनी लग्न समारंभात गोंधळ घातला. यावेळी दगडफेकीसह धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला. यामध्ये चार तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी पाहणी केली.

एसडीपीओ अनिल कुमार सिंह, मुफस्सिल पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश पासवान, नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी आरएन चौधरी, पोलीस निरीक्षक विनय कुमार राम हे देखील पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.

लग्नसमारंभात जेवण न दिल्याने मुद्दाम गोंधळ झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाने लग्नात वाद निर्माण केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पतरोडीह येथील शंकर नावाच्या व्यक्तीच्या घरी वरात आली होती.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण जेवणासाठी पोहोचला आणि गरम पुरीची मागणी करू लागला. यानंतर मोठा वाद झाला. तरुणाने बाहेरून काही साथीदारांना बोलावून गोंधळ घातला. तसेच शिवीगाळ करून दगडफेक केली. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न