शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren Case : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा खरा मालक कुणी वेगळाच!

By पूनम अपराज | Updated: March 9, 2021 19:11 IST

Mansukh Hiren Death Controversy: विमला यांनी जबाबात नोव्हेंबर २०२० ते ६ मार्चपर्यंतचा घटनाक्रम उलगडला आहे.

ठळक मुद्दे२ मार्चला सायंकाळी दुकानातून मनसुख घरी आले आणि सांगितले सचिन वाझेसोबत मुंबईत गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरून ऍडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून आणि  मीडियाकडून फोन येत असल्याने त्रास होत असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री, ठाणे आणि मुंबई पो

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह सापडल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात ५ मार्चला अपमृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस चौकशी करत होते. मात्र चौकशीदरम्यान मनसुख यांचा मृतदेह सापडल्याने गृहमंत्र्यांनी याबाबत तपास मुंबई पोलिसांकडे न देता एटीएसकडे दिला. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने ७ मार्चला रीतसर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विमला यांनी एटीएसने दिलेल्या आपल्या जबाबात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. विमला यांनी जबाबात नोव्हेंबर २०२० ते ६ मार्च पर्यंतचा घटनाक्रम उलगडला आहे. या जबाबातून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळलेल्या स्कॉर्पिओ कारचा खरा मालक डॉ. पिटर न्यूटन असल्याचं समोर येत आहे. 

 

एटीएसने विमला यांच्या नोंदवलेल्या जबाबात असे नमूद करण्यात आले आहे की, विमला आणि मनसुख यांना मीत (२०), वंश (१३) आणि लकी (१९) ही तीन मुलं असून मनसुख यांचे क्लासिक कार डेकोर नावाचे ठाण्यात ऑटोमोबाईल ऍक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय आहे. आमच्या व्यवसायातील ग्राहक डॉ. पिटर न्यूटन यांच्या मालकीची महिंद्रा स्कॉर्पिओ कर क्रमांक एमएच ०२/एवाय २८१५ हि गेल्या ३ वर्षांपासून त्यांच्या संमतीने आमच्या ताब्यात होती. वाहनाचा वापर आम्ही कुटुंबीय करत होतो. आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या परिचयाचे होते. 

 

वाझे यांना माझे पती मनसुख यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये स्कॉर्पिओ कार वापरण्यासाठी दिली होती. ही स्कॉर्पिओ कार वाझे यांनी ५ फेब्रुवारीला त्यांच्या चालकामार्फत माझ्या पतीकडे दुकानावर पाठवून दिली. त्यावेळी स्कॉर्पिओचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याचे मनसुख यांनी मला सांगितले होते. मनसुख १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६. ३० वाजताच्या सुमारास ठाणे येथील दुकानातून व्यवसायानिमित्त स्कॉर्पिओमधून एकटेच मुंबईला जाण्यासाठी निघाले. मात्र, मुलुंड टोल नका क्रॉस करून पुढे गेल्यानंतर कारचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याने मनसुख यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केली. त्यांनतर ओला / उबर कारने पुढे मुंबईला गेले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारीला दुकानातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन स्कॉर्पिओ दुरुस्त करण्यासाठी म्हणून पार्क केलेल्या ठिकाणी गेले असता कार त्या ठिकाणी दिसली नाही. ही बाब मनसुख यांनी पत्नी विमला यांना १८ फेब्रुवारीला सांगितली. नंतर कार हरवल्याबाबत मनसुख यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ स्फोटकांसह आढळली. ही बातमी मी टीव्हीवर पहिली. मात्र, ती आमची चोरीला गेलेली गाडी आहे कि नाही याबाबत गाडीचा क्रमांक वेगळा असल्याने खातरजमा झाली नव्हती. नंतर एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखेकडून कॉल येण्यास सुरुवात झाली. २६ फेब्रुवारी सकाळी सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत मनसुख मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. त्यानंतर तरी १०. ३० वाजताच्या सुमारास ते घरी पार्ट सचिन वाझेंसोबत आले. २७ फेब्रुवारीला पुन्हा सकाळी मनसुख वाझेंसोबत गेले आणि रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घरी आले होते. नंतर २८ फेब्रुवारीला सुद्धा वाझेंसोबत मनसुख गेले. त्यांचा जबाब नोंद करण्यात आला. जबाबची प्रत मनसुख यांनी घरी आणून ठेवली होती. त्यावर सचिन वाझे यांचे नाव आणि सही आहे. 

 

१ मार्चला पतीला भायखळा पोलिसांकडून फोन आला आणि चौकशीसाठी बोलवले असल्याचे मला सांगितले. मात्र, त्यादिवशी ते कोठे गेले नाहीत, ते त्यादिवशी घरीच होते. २ मार्चला सायंकाळी दुकानातून मनसुख घरी आले आणि सांगितले सचिन वाझेसोबत मुंबईत गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरून ऍडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून आणि  मीडियाकडून फोन येत असल्याने त्रास होत असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री, ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना  दिली. ३ मार्चला सकाळी नेहमीप्रमाणे मनसुख दुकानात गेले आणि रात्री दुकानातून ९ वाजताच्या सुमारास आले.  त्यावेळी रात्री मला माझे पती यांनी सांगितले की, सचिन वाजे बोलत आहे की, तू या केसमध्ये अटक हो, दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो, मी त्यावेळी हिरेन यांना सांगितले, तुम्ही अटक होण्याचो काही गरज नाही. आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी हिरेन थोडे टेन्शनमध्ये असल्याचे वाटत होते. 

  

४ मार्चला माझे पती हिरेन यांनी सकाळी माझ्या मोबाईलवरून माझे दीर विनोद  यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल, तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकीलांशी माझा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणी करून ठेव असे सांगून ते दुकानात निघून गेले होते, असे विमला यांनी आपल्या जबाबात एटीएसला माहिती दिली आहे. ४ मार्चला सायंकाळी मनसुख यांच्यासाठी घरामधून जेवणाचा डबा घेऊन माझा मोठा मुलगा मीत हा दुकानात गेला. साधारण  रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मनसुख यांचे मला मिस कॉल आले. विमला यांनी  त्यांना फोन केला असता ते लिफ्टमधून घरी येत होते. त्यावर विमला यांनी एवढ्या लवकर कसे आलात? अशी विचारणा केली असता त्यावर मनसुख यांनी बाहेर जायचे सांगितले. मनसुख यांनी कांदिवलीहून पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला होता, त्यांना मी भेटायला घोडबंदरला जात असल्याचे पत्नीस सांगितले.  रिक्षाने मनसुख गेले. ९.३० वाजता माझा मुलगा मीत हा दुकानातून घरी आला आणि त्याने विमला यांनयांना डॅडी अजून आले नाहीत का? त्यादिवशी रात्री ११ पर्यंत मनसुख घरी न आल्याने वाट पाहून मोबाईलवर कॉल केला. मात्र, फोन स्विच ऑफ येत असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. नंतर ५ मार्चला नौपाडा पोलीस ठाण्यात मुलगा मीत आणि मनसुख यांचे भाऊ विनोद यांनी मिसिंगची तक्रार दिली. दुपारी ३.३० वाजता मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती मीतने आई विमलाला दिली. असा एकूण घटनाक्रम विमला यांनी आपल्या जबाबात सांगितला आहे. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणAnti Terrorist SquadएटीएसthaneठाणेMukesh Ambaniमुकेश अंबानी