शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Mansukh Hiren Case : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा खरा मालक कुणी वेगळाच!

By पूनम अपराज | Updated: March 9, 2021 19:11 IST

Mansukh Hiren Death Controversy: विमला यांनी जबाबात नोव्हेंबर २०२० ते ६ मार्चपर्यंतचा घटनाक्रम उलगडला आहे.

ठळक मुद्दे२ मार्चला सायंकाळी दुकानातून मनसुख घरी आले आणि सांगितले सचिन वाझेसोबत मुंबईत गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरून ऍडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून आणि  मीडियाकडून फोन येत असल्याने त्रास होत असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री, ठाणे आणि मुंबई पो

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह सापडल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात ५ मार्चला अपमृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस चौकशी करत होते. मात्र चौकशीदरम्यान मनसुख यांचा मृतदेह सापडल्याने गृहमंत्र्यांनी याबाबत तपास मुंबई पोलिसांकडे न देता एटीएसकडे दिला. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने ७ मार्चला रीतसर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विमला यांनी एटीएसने दिलेल्या आपल्या जबाबात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. विमला यांनी जबाबात नोव्हेंबर २०२० ते ६ मार्च पर्यंतचा घटनाक्रम उलगडला आहे. या जबाबातून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळलेल्या स्कॉर्पिओ कारचा खरा मालक डॉ. पिटर न्यूटन असल्याचं समोर येत आहे. 

 

एटीएसने विमला यांच्या नोंदवलेल्या जबाबात असे नमूद करण्यात आले आहे की, विमला आणि मनसुख यांना मीत (२०), वंश (१३) आणि लकी (१९) ही तीन मुलं असून मनसुख यांचे क्लासिक कार डेकोर नावाचे ठाण्यात ऑटोमोबाईल ऍक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय आहे. आमच्या व्यवसायातील ग्राहक डॉ. पिटर न्यूटन यांच्या मालकीची महिंद्रा स्कॉर्पिओ कर क्रमांक एमएच ०२/एवाय २८१५ हि गेल्या ३ वर्षांपासून त्यांच्या संमतीने आमच्या ताब्यात होती. वाहनाचा वापर आम्ही कुटुंबीय करत होतो. आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या परिचयाचे होते. 

 

वाझे यांना माझे पती मनसुख यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये स्कॉर्पिओ कार वापरण्यासाठी दिली होती. ही स्कॉर्पिओ कार वाझे यांनी ५ फेब्रुवारीला त्यांच्या चालकामार्फत माझ्या पतीकडे दुकानावर पाठवून दिली. त्यावेळी स्कॉर्पिओचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याचे मनसुख यांनी मला सांगितले होते. मनसुख १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६. ३० वाजताच्या सुमारास ठाणे येथील दुकानातून व्यवसायानिमित्त स्कॉर्पिओमधून एकटेच मुंबईला जाण्यासाठी निघाले. मात्र, मुलुंड टोल नका क्रॉस करून पुढे गेल्यानंतर कारचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याने मनसुख यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केली. त्यांनतर ओला / उबर कारने पुढे मुंबईला गेले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारीला दुकानातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन स्कॉर्पिओ दुरुस्त करण्यासाठी म्हणून पार्क केलेल्या ठिकाणी गेले असता कार त्या ठिकाणी दिसली नाही. ही बाब मनसुख यांनी पत्नी विमला यांना १८ फेब्रुवारीला सांगितली. नंतर कार हरवल्याबाबत मनसुख यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ स्फोटकांसह आढळली. ही बातमी मी टीव्हीवर पहिली. मात्र, ती आमची चोरीला गेलेली गाडी आहे कि नाही याबाबत गाडीचा क्रमांक वेगळा असल्याने खातरजमा झाली नव्हती. नंतर एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखेकडून कॉल येण्यास सुरुवात झाली. २६ फेब्रुवारी सकाळी सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत मनसुख मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. त्यानंतर तरी १०. ३० वाजताच्या सुमारास ते घरी पार्ट सचिन वाझेंसोबत आले. २७ फेब्रुवारीला पुन्हा सकाळी मनसुख वाझेंसोबत गेले आणि रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घरी आले होते. नंतर २८ फेब्रुवारीला सुद्धा वाझेंसोबत मनसुख गेले. त्यांचा जबाब नोंद करण्यात आला. जबाबची प्रत मनसुख यांनी घरी आणून ठेवली होती. त्यावर सचिन वाझे यांचे नाव आणि सही आहे. 

 

१ मार्चला पतीला भायखळा पोलिसांकडून फोन आला आणि चौकशीसाठी बोलवले असल्याचे मला सांगितले. मात्र, त्यादिवशी ते कोठे गेले नाहीत, ते त्यादिवशी घरीच होते. २ मार्चला सायंकाळी दुकानातून मनसुख घरी आले आणि सांगितले सचिन वाझेसोबत मुंबईत गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरून ऍडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून आणि  मीडियाकडून फोन येत असल्याने त्रास होत असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री, ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना  दिली. ३ मार्चला सकाळी नेहमीप्रमाणे मनसुख दुकानात गेले आणि रात्री दुकानातून ९ वाजताच्या सुमारास आले.  त्यावेळी रात्री मला माझे पती यांनी सांगितले की, सचिन वाजे बोलत आहे की, तू या केसमध्ये अटक हो, दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो, मी त्यावेळी हिरेन यांना सांगितले, तुम्ही अटक होण्याचो काही गरज नाही. आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी हिरेन थोडे टेन्शनमध्ये असल्याचे वाटत होते. 

  

४ मार्चला माझे पती हिरेन यांनी सकाळी माझ्या मोबाईलवरून माझे दीर विनोद  यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल, तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकीलांशी माझा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणी करून ठेव असे सांगून ते दुकानात निघून गेले होते, असे विमला यांनी आपल्या जबाबात एटीएसला माहिती दिली आहे. ४ मार्चला सायंकाळी मनसुख यांच्यासाठी घरामधून जेवणाचा डबा घेऊन माझा मोठा मुलगा मीत हा दुकानात गेला. साधारण  रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मनसुख यांचे मला मिस कॉल आले. विमला यांनी  त्यांना फोन केला असता ते लिफ्टमधून घरी येत होते. त्यावर विमला यांनी एवढ्या लवकर कसे आलात? अशी विचारणा केली असता त्यावर मनसुख यांनी बाहेर जायचे सांगितले. मनसुख यांनी कांदिवलीहून पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला होता, त्यांना मी भेटायला घोडबंदरला जात असल्याचे पत्नीस सांगितले.  रिक्षाने मनसुख गेले. ९.३० वाजता माझा मुलगा मीत हा दुकानातून घरी आला आणि त्याने विमला यांनयांना डॅडी अजून आले नाहीत का? त्यादिवशी रात्री ११ पर्यंत मनसुख घरी न आल्याने वाट पाहून मोबाईलवर कॉल केला. मात्र, फोन स्विच ऑफ येत असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. नंतर ५ मार्चला नौपाडा पोलीस ठाण्यात मुलगा मीत आणि मनसुख यांचे भाऊ विनोद यांनी मिसिंगची तक्रार दिली. दुपारी ३.३० वाजता मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती मीतने आई विमलाला दिली. असा एकूण घटनाक्रम विमला यांनी आपल्या जबाबात सांगितला आहे. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणAnti Terrorist SquadएटीएसthaneठाणेMukesh Ambaniमुकेश अंबानी