शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शरीरसंबंधास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या; ३ मुलांना कालव्यात फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 12:30 IST

१५ दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत असल्यानं पत्नीची निर्घृण हत्या; कालव्यात फेकलेली मुलं बुडाल्याची भीती

मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका ३७ वर्षीय व्यक्तीनं त्याच्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पत्नीनं शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं नाराज झालेल्या पत्नीनं पतीचा खून केला. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीनं स्वत:च्या ३ मुलांना कालव्यात फेकलं. मुझफ्फरनगरमधील बसेडी गावात ही घटना घडली. या मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही.पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'पत्नी १५ दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत होती. सकाळी तिनं न ऐकल्यास तिची हत्या करायची असा निश्चय आदल्या रात्रीच केला होता आणि तेच झालं. सकाळी पत्नीनं जवळ येण्यास नकार दिला. त्यामुळे तिची गोळी झाडून हत्या केली,' अशी माहिती पतीनं चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.पत्नीची हत्या केल्यानंतर पती मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. पत्नीनंतर मुलांचं पालनपोषण कोण करणार, या विचारानं त्यानं मुलांना कालव्यात फेकून दिलं. सानिया, वंश आणि हर्षिता अशी या मुलांची नावं आहेत. यापैकी हर्षिता केवळ १५ महिन्यांची आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. त्याचं नाव पप्पू असं आहे. कालव्यात फेकण्यात आलेल्या मुलांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप एकही मूल हाती लागलेलं नाही. पोलिसांनी पप्पूला तुरुंगात पाठवलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.