शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र जमीन भाडेपट्टा कायदा ४ वर्षांपासून केंद्राने दाबला; विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:12 IST

महाराष्ट्र विधानसभेने ते विधेयक संमत केले असून २५ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून दिले होते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आम्ही तीन नवे कृषी कायदे केल्याचा दावा करते; परंतु विरोधाभास असा की, महाराष्ट्र कृषी जमीन भाडेपट्टा कायदा (महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल लँड लिझिंग ॲक्ट-एमएएलएलए) केंद्र सरकारने चार वर्षांपासून दाबून ठेवला आहे. 

महाराष्ट्र विधानसभेने ते विधेयक संमत केले असून २५ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून दिले होते. राज्यांनी बनवलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना हे विधेयक विधानसभेत संमत झाले होते; परंतु ते विधेयक या ना त्या कारणामुळे लोंबकळले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी संसदेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे वस्तुस्थिती समोर आली. रेड्डी म्हणाले, “प्रथेप्रमाणे राज्यांकडून विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी विधेयके मिळालीआणि केंद्र सरकारची नोडल मंत्रालये, विभागांशी विचारविनिमय करून प्रक्रिया केली गेली आहे.”

कृपाल बालाजी तुमाने आणि हरिभाऊ जाधव यांनी विचारलेल्या दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी म्हणाले की, महाराष्ट्र कृषी जमीन भाडेपट्टा विधेयक २०१७ बाबत वेगवेगळी मंत्रालये, विभागांशी विचारविनिमयाची प्रक्रिया १२ मे २०१७ रोजी सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले की, महाराष्ट्र सरकारकडून काही मुद्यांवर केंद्र सरकारच्या विभागांनी अनेक स्पष्टीकरणे आणि उत्तरे मागितली होती.

विचारविनिमयाच्या प्रक्रियेला वेळ लागतो

महाराष्ट्र सरकारकडून सर्व स्पष्टीकरणे १४ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली असून संबंधित मंत्रालये आणि विभागांशी विचारविनिमय करून त्यांची तपासणीही केली गेली आहे, असा दुजोरा केंद्र सरकारने दिला. सरकारला सदस्यांनी विधेयकाला मंजुरी का मिळाली नाही आणि ती कधी मिळेल याची माहिती द्या, असे जोर देऊन म्हटल्यावर मंत्री रेड्डी यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “अशा प्रकरणांत विचारविनिमयाच्या प्रक्रियेला वेळ लागतो. अशा मंजुरीसाठी ठराविक मुदतीची चौकट घालता येणार नाही.”