शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 10:45 IST

काही महिन्यांपूर्वी जेव्हा इंदूरमध्ये भिकारीमुक्त अभियान चालवले तेव्हाही एका लखपती महिला भिकारी पकडण्यात आली होती.  

मध्य प्रदेशातील इंदूर इथं पोलिसांनी भिकाऱ्यांच्या अशा टोळीला पकडलं आहे जे राजस्थानाहून मध्य प्रदेशात भीक मागायला येत होते. या २२ जणांची टोळी शहरातील विविध भागात दिवसभर भीक मागायची आणि रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करायची. २२ जणांमध्ये ११ लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना ताब्यात घेत पुन्हा राजस्थानला पाठवण्यात आले आहे. 

महिला आणि बालकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी मिळालेल्या एका तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या तपासात राजस्थानहून २२ जणांची टोळी भीक मागण्यासाठी इंदूरला आल्याचं समोर आले. हे सर्व लोक एकाच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्यात ११ अल्पवयीन मुलांचाही समावेश होता तर इतर महिला होत्या. हे लोक शहरातील विविध ठिकाणी दिवसभर भीक मागत होते आणि त्यानंतर रात्री हॉटेलमध्ये जाऊन झोपत होते असं त्यांनी म्हटलं. 

या सर्व लोकांना समज देऊन राजस्थानच्या त्यांच्या मूळगावी सोडून देण्यात आले आहे. शहरातील सर्व हॉटेल, लॉज आणि इतर विश्रामस्थळांना पोलिसांकडून निर्देश देण्यात आले आहेत. भीक मागणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला हॉटेलमध्ये जागा देऊ नये अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करू असं पोलिसांनी म्हटलं. केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून इंदूरसह देशभरातील १० शहरांत भिक्षावृत्ती मुक्त अभियान प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इंदूर शहरात भीक मागणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

इंदूरमध्ये पकडली लखपती महिला भिकारी

काही महिन्यांपूर्वी जेव्हा इंदूरमध्ये भिकारीमुक्त अभियान चालवले तेव्हा एका महिलेला पकडण्यात आले. ही महिला तिच्या २ मुलांसह भीक मागण्याचं काम करत होती. उज्जैन रोडवरील लवकुश चौकात ती भीक मागायची. त्या महिलेने केवळ २ महिन्यात भीक मागून अडीच लाख रुपयांची कमाई केली होती. त्यातील १ लाख रुपये तिच्या सासू सासऱ्यांना पाठवले. तपासात या महिलेची विविध ठिकाणी संपत्ती असल्याचेही उघड झाले. या महिलेकडे १ जमीन, २ मजली घर, एक बाईक, २० हजारांचा स्मार्टफोन आढळला. ही महिलाही राजस्थानची असल्याचं समोर आले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश