शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

महिन्याभरापासून कुटुंब होतं बेपत्ता; शेतात खणला १० फूट खड्डा अन् मग एकापाठोपाठ एक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:12 IST

पोलिसांकडून सहा जणांना बेड्या; प्रेम प्रकरणातून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

देवास: गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळी आढळून आले. देवास जिल्ह्यातील एका शेतातून संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळले. पाच जणांची गळा आवळून हत्या झाली असून त्यांचे मृतदेह ८ ते १० फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आले. विशेष म्हणजे हा खड्डा आधीच खणण्यात आला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षांच्या ममता, त्यांच्या दोन मुली (२१ वर्षांची रुपाली आणि १४ वर्षांची दिव्या) आणि त्यांच्या दोन चुलत बहिणी १३ मे रोजी घरातून बेपत्ता झाल्या. मृतांपैकी एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असेलला घर मालक आणि त्याच्या जवळच्या १२ साथीदारांनी पाच जणांची हत्या केली. या प्रकरणी मुख्य आरोपी सुरेंद्र आणि चार अन्य व्यक्तींना अटक करण्यात आली असून सात जणांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दहा फूट खड्डा खणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कबरींमध्ये पाच मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडले. कोणत्याच मृतदेहावर कपडा नव्हता. आरोपींनी पाचही आरोपींचे कपडे जाळले होते. यासोबतच मृतहेल लवकर नष्ट करण्यासाठी मीठ आणि यूरियाचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी सुरेंद्र चौहानसह सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी शिवपाल सिंह यांनी दिली. चौहान यांनी हत्येची योजना आखली आणि इतर ५ जणांनी मृतदेह पुरण्यासाठी त्यांना खड्डा खणण्यास मदत केली.

'कुटुंबियांनी पाच जण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मारेकऱ्यांनी सोशल मीडियावर महिलेच्या मोठ्या मुलीच्या आईडीवरून मेसेज पोस्ट करून पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. रुपालीनं आपल्या इच्छेनं लग्न केलं असून लहान बहिण, दोन्ही चुलत बहिणी आणि आई आपल्यासोबत सुरक्षित असल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला होता,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी रुपालीचा मेसेज पाहून तिचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. तिच्या कॉल डिटेल्समधून ती घरमालकाच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी घरमालकाची चौकशी केली. मात्र आपले रुपालीशी संबंध नसल्याचं त्यानं सांगितलं. घरमालक १३ मे रोजी पाच व्यक्तींच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं पोलिसांना कॉल रेकॉर्डवरून समजलं. घरमालक सुरेंद्र आणि रुपाली रिलेशनशिपमध्ये होते. मात्र सुरेंद्र एका अन्य महिलेसोबत लग्न करणार होता. त्याची माहिती मिळताच रुपाली नाराज झाली. तिनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. ते पाहून सुरेंद्र संतापला आणि त्यानं रुपालीसह तिच्या कुटुंबातील आणखी ४ जणांची हत्या केली.