शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

महिन्याभरापासून कुटुंब होतं बेपत्ता; शेतात खणला १० फूट खड्डा अन् मग एकापाठोपाठ एक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:12 IST

पोलिसांकडून सहा जणांना बेड्या; प्रेम प्रकरणातून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

देवास: गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळी आढळून आले. देवास जिल्ह्यातील एका शेतातून संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळले. पाच जणांची गळा आवळून हत्या झाली असून त्यांचे मृतदेह ८ ते १० फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आले. विशेष म्हणजे हा खड्डा आधीच खणण्यात आला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षांच्या ममता, त्यांच्या दोन मुली (२१ वर्षांची रुपाली आणि १४ वर्षांची दिव्या) आणि त्यांच्या दोन चुलत बहिणी १३ मे रोजी घरातून बेपत्ता झाल्या. मृतांपैकी एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असेलला घर मालक आणि त्याच्या जवळच्या १२ साथीदारांनी पाच जणांची हत्या केली. या प्रकरणी मुख्य आरोपी सुरेंद्र आणि चार अन्य व्यक्तींना अटक करण्यात आली असून सात जणांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दहा फूट खड्डा खणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कबरींमध्ये पाच मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडले. कोणत्याच मृतदेहावर कपडा नव्हता. आरोपींनी पाचही आरोपींचे कपडे जाळले होते. यासोबतच मृतहेल लवकर नष्ट करण्यासाठी मीठ आणि यूरियाचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी सुरेंद्र चौहानसह सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी शिवपाल सिंह यांनी दिली. चौहान यांनी हत्येची योजना आखली आणि इतर ५ जणांनी मृतदेह पुरण्यासाठी त्यांना खड्डा खणण्यास मदत केली.

'कुटुंबियांनी पाच जण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मारेकऱ्यांनी सोशल मीडियावर महिलेच्या मोठ्या मुलीच्या आईडीवरून मेसेज पोस्ट करून पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. रुपालीनं आपल्या इच्छेनं लग्न केलं असून लहान बहिण, दोन्ही चुलत बहिणी आणि आई आपल्यासोबत सुरक्षित असल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला होता,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी रुपालीचा मेसेज पाहून तिचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. तिच्या कॉल डिटेल्समधून ती घरमालकाच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी घरमालकाची चौकशी केली. मात्र आपले रुपालीशी संबंध नसल्याचं त्यानं सांगितलं. घरमालक १३ मे रोजी पाच व्यक्तींच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं पोलिसांना कॉल रेकॉर्डवरून समजलं. घरमालक सुरेंद्र आणि रुपाली रिलेशनशिपमध्ये होते. मात्र सुरेंद्र एका अन्य महिलेसोबत लग्न करणार होता. त्याची माहिती मिळताच रुपाली नाराज झाली. तिनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. ते पाहून सुरेंद्र संतापला आणि त्यानं रुपालीसह तिच्या कुटुंबातील आणखी ४ जणांची हत्या केली.