शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ऐकावे ते नवलंच! चविष्ठ खाद्यपदार्थांसाठी मुलाने सोडले घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:47 IST

फक्त गावाच्या नावावरून रेल्वे पोलिसांनी पोहोचविले घरी

ठळक मुद्देमुलाचे संरक्षण आणि काळजीपोटी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाण्यात आणले.  ८ डिसेंबर रोजी हा मुलगा खाऊकरिता घरातून पैसे घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबियांकडून नंदलाल शंकर प्रसाद (१७) हरविला असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. 

मुुंबई - चविष्ठ खाद्यपदार्थांच्या आशेने रेल्वे प्रवास करून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचलेला गतिमंद मुलगा अखेर आपल्या घरी परतला आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी या मुलाला झारखंड येथील मनिका या गावी सोडत कुटुंबियाच्या ताब्यात दिले.  मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामधील उपनगरीय लोकलमध्ये घाबरलेल्या आणि गांगरलेल्या अवस्थेत विनापालक १७ वर्षीय मुलगा लोहमार्ग पोलीस कर्मचाºयाला निदर्शनास आला. यावेळी त्याच्या हालचाली आणि वर्तन पाहून मुलगा गतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाचे संरक्षण आणि काळजीपोटी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाण्यात आणले.  मुलगा अल्पवयीन आणि घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीही बोलत नव्हता. फक्त त्याने ‘मनिका’ या ठिकाणी राहतो एवढेच सांगितले. मुलाकडून मिळालेल्या मनिका नामक ठिकाणावरून मुलगा कोणत्या प्रांतातला आहे, हे उलगडणे कठिण होते. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनिका ठिकाणाचा शोध घेतला. तेव्हा झारखंड राज्यात लतेहार या जिल्हामध्ये मनिका हे गाव असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा मनिका येथील स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क केल्यावर एक महिन्याअगोदर हा मुलगा हरवल्याची तक्रार  त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती.   ८ डिसेंबर रोजी हा मुलगा खाऊकरिता घरातून पैसे घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबियांकडून नंदलाल शंकर प्रसाद (१७) हरविला असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.  मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्यावतीने त्याला सुखरूप कुटुंबियाकडे देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबई