शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विवाहित प्रेयसीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; मुंब्य्रातील घटना, ठाणे न्यायालयाचा निकाल

By जितेंद्र कालेकर | Updated: July 19, 2023 21:42 IST

दंड न भरल्यास सहा महिने कठोर कारावासाची अतिरिक्त शिक्षाही या आरोपीला भोगावी लागणार असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता अनिल लाडवंजारी यांनी बुधवारी दिली.

लोेकमत न्यूज नेटवर्कठाणे : विवाहित प्रेयसीबरोबर झालेल्या भांडणातून तिची हत्या करणाऱ्या अतुल कमलेश सिंग (रा. दिवा, ठाणे) या आरोपीला ठाण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश अभय मंत्री यांनी जन्मठेपेची तसेच २० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कठोर कारावासाची अतिरिक्त शिक्षाही या आरोपीला भोगावी लागणार असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता अनिल लाडवंजारी यांनी बुधवारी दिली.

या खटल्यातील अविवाहित आरोपी अतुल याचे विवाहितेशी प्रेमसंबंध होते. विवाहित असल्यामुळे संबंध ठेवण्यास ती नकार देत होती. याच कारणावरून दोघांमध्ये २०१७ मध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून अतुल याने मुंब्रा भागात राहणाऱ्या या विवाहितेच्या घरात शिरून कटर व ब्लेडच्या साहाय्याने तिचा खून केला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकाने त्याला अटक केली होती.

सरकारी अभियोक्ता अनिल लाडवंजारी यांनी १२ ते १३ साक्षीदार तसेच पुरावे सादर करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. पोलिस नाईक विद्यासागर कोळी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व बाजूंची पडताळणी झाल्यानंतर न्या. अभय मंत्री यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी