शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना जन्मठेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 16:20 IST

सत्र न्यायालयाने या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  

ठळक मुद्देभावाला खोटी माहिती देऊन ५ आरोपींनी राजस्थान येथे बोलविले आणि त्याचे अपहरण केले. आरोपींनी पंकज या प्रवीण यांच्या भावाकडे ५ लाखांची खंडणी मागितली. कलम १२० - ब अन्वये सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.  

मुंबई - २०१४ साली प्रवीण गुप्ता यांच्या भावाला खोटी माहिती देऊन ५ आरोपींनी राजस्थान येथे बोलविले आणि त्याचे अपहरण केले. अपहृत भावाच्या सुटकेसाठी आरोपींनी पंकज या प्रवीण यांच्या भावाकडे ५ लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर गुन्हे शाखा कक्ष ५ ने पाच आरोपींना राजस्थान येथून अटक केली. काल सत्र न्यायालयाने या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  

जुलै आणि ऑगस्ट २०१४ दरम्यान पंकज गुप्ता यांना हरियाणा येथून राहुलने फोन करून ते कायदेशीररित्या सोन्याची विक्री करत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांना सेल्समनची आवश्यकता असल्याचं सांगून हरियाणातील फरिदाबाद येथे भेटण्यासाठी बोलाविले. पंकज यांनी त्यांचा भाऊ प्रवीण गुप्ता यास या कामासाठी फरिदाबाद येथे पाठविले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी प्रवीण यांना डांबून ठेवले आणि पंकज या त्यांच्या भावाकडे प्रवीणला सोडविण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात पंकज यांनी २०१४ साली गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर खंडणीची पैसे देण्यासाठी पंकज यांना राजस्थान येथील कामा येथे आरोपींनी बोलाविले. त्यावेळी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पथकाने सापळा रचून 

इरफान हमीद खान उर्फ कुरेशी (४६), इलियास फझर खान (४४), वाहिद ताला जोगी (३०), आझाद मेऊ उर्फ खान (२९) आणि कासम मेऊ उर्फ खान (२९) या ५ आरोपींना रंगेहाथ अटक केली. अपहृत प्रवीण गुप्ता यांची सुखरूप सुटका करण्यात आली. अटक केल्यानंतर आतापर्यंत सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना सत्र न्यायालयाने सर्व साक्षीदार, तांत्रिक, परिस्थितीजन्य आणि कागदोपत्री पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज हा निकाल सत्र न्यायायालयाने दिला आहे. या ५ आरोपींना दोषी ठरवून भा. दं. वि. कलम ३८७ श १२० - ब अन्वये ५ वर्ष शिक्षा आणि २ हजार रुपये दंड तर कलम ३४२ सह १२० - ब अन्वये १ वर्ष शिक्षा आणि १ हजार रुपये दंड आणि कलम १२० - ब अन्वये सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयKidnappingअपहरणExtortionखंडणीPoliceपोलिस