शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींची जमीन ५४ कोटींना खरेदी; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह १० जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:45 IST

जनहित डावलणाऱ्यांवर कडक कारवाई होणारच- मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

डेहराडून: हरिद्वारमध्ये झालेल्या सुमारे ५४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने मंगळवारी दोन आयएएस अधिकारी व आणखी आठजणांना निलंबित केले. त्यामध्ये हरिद्वारचे जिल्हाधिकारी कर्मेन्द्र सिंग, तत्कालीन महापालिका आयुक्त वरुण चौधरी आणि उपविभागीय दंडाधिकारी अजयवीर सिंग यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दक्षता विभागाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्याचाही आदेश दिला आहे. तसेच वरुण चौधरी यांच्या कार्यकाळात हरिद्वार महापालिकेने केलेल्या सर्व कामांचे विशेष लेखापरीक्षण करावे, जेणेकरून आर्थिक अनियमिततेची पूर्ण चौकशी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने ग्राम सराई येथील कचराकुंडीच्या शेजारील सुमारे २.३०७० हेक्टर जमीन ५४ कोटी रुपयांना खरेदी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. ही जमीन पूर्वी शेतीयोग्य होती, मात्र नंतर ही जमीन व्यावसायिक वापरासाठी असल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे तिची किंमत १५ कोटी रुपयांवरून थेट ५४ कोटी रुपयांवर गेली. (वृत्तसंस्था)

या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

  • कर्मेन्द्र सिंह - जिल्हाधिकारी व तत्कालीन प्रशासक हरिद्वार महापालिका
  • वरुण चौधरी - तत्कालीन आयुक्त, हरिव्दार महापालिका
  • अजयवीर सिंह- तत्कालीन उपजिल्हाधिकारी, हरिद्वार
  • निकिता बिष्ट - वरिष्ठ वित्त अधिकारी, हरिद्वार महापालिका
  • विक्की – वरिष्ठ वैयक्तिक सहायक
  • राजेशकुमार - रजिस्ट्रार कानूनगो, हरिव्दार तहसील
  • कमलदास –मुख्य प्रशासनिक अधिकारी, हरिद्वार तहसील

यापूर्वी निलंबनाची कारवाई झालेले अधिकारी

  • रविंद्रकुमार दयाल- प्रभारी सहायक नगरआयुक्त
  • आनंद सिंह मिश्रवाण- प्रभारी कार्यकारी अभियंता
  • लक्ष्मीकांत भट्ट- कर तसेच राजस्व अधीक्षक
  • दिनेशचंद्र कांडपाल- अवर अभियंता
  • वेदपाल - मालमत्ता विभाग लिपिक (सेवा विस्तार समाप्त)

‘जनहित डावलणाऱ्यांवर कडक कारवाई होणारच’

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तराखंडमध्ये भ्रष्टाचारमुक्त कार्यसंस्कृती विकसित करणे हा आमचा उद्देश आहे. कोणताही अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी तो जनहित आणि नियम डावलत असेल, तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड