शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोशल मीडियावरील मित्राकड़ूनच अपहरण, मध्य प्रदेशमधून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 02:35 IST

आग्रीपाडा परिसरात राहणारी १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या आजीने १ जुलै रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

 मुंबई : सोशल मीडियावरून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच आरोपीने चार साथीदारांच्या मदतीने मुलीचे अपहरण करीत तिला मध्य प्रदेशला नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचारही केले. आग्रीपाडा पोलिसांनी मध्य प्रदेश येथून मुलीची सुटका करीत पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.आग्रीपाडा परिसरात राहणारी १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या आजीने १ जुलै रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. तपासादरम्यान ही मुलगी सोशल मीडियावर कुणाच्या तरी संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हाच धागा पकड़ून पोलिसांनी शोध सुरू केला.आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश जाधव, अभिजित टेकवडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने अधिक तपास सुरू केला.सोशल मीडियावरील मित्राच्या लिंकवरून मुलगी मध्य प्रदेशला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाव घेतली. तसेच यांना मध्य प्रदेशला पोहोचविण्यास मदत करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पथकाने शिताफीने मुलीची सुटका करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मुलीला पळवून नेण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे.मध्य प्रदेश ते मुंबई आणि मुंबई ते मध्य प्रदेशआरोपी हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून, हरयाणाला काम करतो. नोकरी सुटल्याने तो मध्य प्रदेशला नातेवाइकांकडे राहण्यास आला होता. याचदरम्यान त्याने मुलीला पळवून आणण्याचे ठरविले. यासाठी चार मित्रांच्या मदतीने खासगी वाहनाने मध्य प्रदेशवरून मुंबई गाठली. मुलीला घेऊन ते पुन्हा मध्य प्रदेशला रवाना झाले. वाटेत पोलिसांनी न अडविल्याने लॉकडाऊनच्या काळातही ते मध्य प्रदेशला पोहोचले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई