शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

“ये रातें, ये मौसम, नदी का किनारा...”सुसाईड नोटमध्ये लिहून युवकाची आत्महत्या; कारण ऐकून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 20:12 IST

युवकाने सुसाईड नोटमध्ये मार्मिक गाणं लिहिलं आहे. माहितीनुसार, मृतकासोबत नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली होती

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. यतींद्रच्या रुमबाहेरील दरवाजा मागील शनिवारपासून बंद होता.घटनास्थळी २ पानांची सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे.

कानपूर -  ये रातें, ये मौसम, नदी का किनारा...हे गाणं लिहून एका युवकाने आत्महत्या केली आहे. या युवकाचा मृतदेह तीन दिवसानंतर रुममध्ये आढळला. सोमवारी रात्री घरात दुर्गंध पसरला तेव्हा घरमालकाने पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे.

युवकाने सुसाईड नोटमध्ये मार्मिक गाणं लिहिलं आहे. माहितीनुसार, मृतकासोबत नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली होती. त्यात त्याला ९ लाखांचा चुना लागला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. लखनौच्या बालागंजच्या आझाद नगरमधील यतींद्र कानपूरच्या हा सत्यम विहारमध्ये रुम भाड्याने घेऊन तेथे वास्तव्यास होता. यतींद्रच्या कुटुंबात पत्नी आणि ५ महिन्याचा मुलगा आहे. यतींद्रची पत्नी एक आठवड्यापूर्वी लखनौला गेली होती.

रुममधून येत होता दुर्गंध

बँकेत कर्मचारी असलेल्या घरमालक अमित यांनी सांगितले की, यतींद्रच्या रुमबाहेरील दरवाजा मागील शनिवारपासून बंद होता. शनिवारनंतर यतींद्रला बाहेर बघितलं नाही. सोमवारी त्याच्या रुममधून खूप दुर्गंध येत होता. दरवाजा वाजवला परंतु आतमधून काहीही आवाज आला नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला. यतींद्रचा मृतदेह जमिनीवर पडला होता. घटनास्थळी २ पानांची सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमला मृत व्यक्तीच्या गळ्याभोवती फास आढळला. दावा केला जातोय की, यतींद्र बेडवर खुर्ची ठेऊन पंख्याला लटकला होता. परंतु गाठ सुटल्याने फास निघाला आणि त्याचा मृतदेह जमिनीवर पडला होता.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?

यतींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये सुरुवातीला ये रातें, ये मौसम, नदी का किनारा असं लिहून पुढे म्हटलंय की, राजकिशोरने नोकरी देण्याच्या बहाण्याने ३ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्याची पत्नी मायानेही मला फसवून ३ लाख रुपये घेतले होते. राजकिशोरने एका साथीदाराच्या मदतीनं कल्याण विभागात नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले. यतींद्रनं पुढे लिहिलंय की, मी माझा मित्र सुरज गंगवार याला ५ हजार रुपये उधार दिले होते. उधारीचे पैसे न देता त्याच्या घरातील पोलिसांची भीती दाखवत होता असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

टॅग्स :Policeपोलिस