शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

नशेत होतो, काय घडले ते आठवत नाही; खार हत्याप्रकरणात संशयितांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 07:12 IST

Murder news: जान्हवीची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत श्री व दिया हे तिच्या घरी वडिलांचा वाढदिवस साजरा करत होते. हे दोघेही तिचे जवळचे मित्र आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खारमध्ये जान्हवी कुकरेजा (१९) या विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पाेलिसांनी श्री जोगधनकर आणि दिया पडळकर यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र नशेत असल्याने त्या रात्री काय घडले याबाबत काहीच आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जान्हवीची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत श्री व दिया हे तिच्या घरी वडिलांचा वाढदिवस साजरा करत होते. हे दोघेही तिचे जवळचे मित्र आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवती हाईट्स इमारतीच्या टेरेसवर ३१ डिसेंबरच्या रात्री सुरू असलेल्या पार्टीत जवळपास १२ जण होते. श्री हा अन्य मुलींच्या जवळ जात होता हे जान्हवीला आवडत नव्हते. त्यातच तिने त्याला दियासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.

याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांनी तिला बेदम मारहाण केली. केसांना धरून शिड्यांवरून फरफटत नेले, अशी माहिती आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, जान्हवीचे डोके रेलिंगला जोरात आपटल्याने तिच्या कवटीला दुखापत झाली आणि वेळेत उपचार मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मारहाणीनंतर दिया आणि श्री हे उपचारासाठी वेगवेगळ्या दवाखान्यांत निघून गेले.

...तर माझी मुलगी वाचली असतीजान्हवीचे मित्र तिला पार्टीसाठी घेऊन गेले आणि ५ वाजता मला तिच्या मृत्यूची बातमी समजली. तिने सव्वादोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, तोपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. पण, एकानेही याबाबत आम्हाला कळविले नाही. वेळेत उपचार मिळाले असते तर माझी मुलगी वाचली असती. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची तयारी करणारी माझी मुलगी आम्हाला कायमची सोडून गेली, असे जान्हवीची आई निधी कुकरेजा यांनी खार पोलीस ठाण्याजवळ रडतच सांगितले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस