शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारतीय नौदलाचे भरसमुद्रात मोठे ऑपरेशन; 12 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 13:27 IST

भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याचे गुप्त सुचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती.

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. इराणहून गुजरातला आणले जाणारा मोठा ड्रग्जचा साठा पकडला आहे. याची किंमत थोडी थोडकी नसून १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि एनसीबीने मिळून ही कारवाई केली आहे. 

नौदलाने २६०० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. हे ड्रग्ज इराणहून गुजरातच्या बंदरावर आणले जात होते. तिथे पोहोचण्यापूर्वीच हे ड्रग ताब्यात घेण्यात आली आहे. हा जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेण्यात आले आहे. त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत, ते कोणाला डिलिव्हर केले जाणार होते, आदी चौकशी केली जाणार आहे. 

भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याचे गुप्त सुचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. यामुळे नौदलाने यासाठी एनसीबीची मदत घेत ही कारवाई केली. नौदलाच्या जहाजाने (INS TEG F-45) अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. अधिकाऱ्यांनी एका ड्रग्ज माफियालाही अटक केली आहे. सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. तिथून परतताच ही मोठी कारवाई झाली आहे. 

याआधीही फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटने २००० कोटींच्या ड्रग्जची खेप पकडली होती. गुजरातच्या लगतच्या सागरी भागात अनेकवेळा कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यावेळी सागरी मार्गाने भारतात आणली जाणारी ड्रग्जची ही सर्वात मोठी खेप होती आहे. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलDrugsअमली पदार्थ