शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

फसवणुकीत वाढ, तपास कागदावरच, गुन्ह्यांत १९ टक्के वाढ; गुन्हेगार पुन्हा सक्रिय; मोठ्या महानगरांतील नागरिक टार्गेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 12:54 IST

Crime News: देशात २०२० मध्ये कोरोना महामारीत आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा या गुन्ह्यांत तब्बल १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात १ लाख ४५ हजार ७५४ गुन्हे घडले होते.

मुंबई : देशात २०२० मध्ये कोरोना महामारीत आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा या गुन्ह्यांत तब्बल १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात १ लाख ४५ हजार ७५४ गुन्हे घडले होते. २०२१ मध्ये त्यामध्ये वाढ होत आर्थिक फसवणूक झालेल्यांची संख्या १ लाख ७२ हजारांवर पोहोचली आहे. फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना तपास मात्र कासवगतीने सुरू  आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, बोगस कागदपत्रे तयार करून, फ्रॉड किंवा अन्य मार्गाने आर्थिक फसवणूक झालेल्या गुन्ह्यांमध्ये ८७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १ लाख ५२ हजार ०७३ प्रकरणे चिटिंग आणि फ्रॉड, बोगस कागदपत्रांद्वारे फसवणुकीशी संबंधित आहेत.

एखाद्याची प्रॉपर्टी बळकवण्याचा उद्देश ठेवून फसवणूक करण्याची २१,२४१ प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर बनावट सहीने फसवणूक केल्याची ६९९ प्रकरणे समोर आली आहेत.

मुंबईत किती गुन्हे? देशातील प्रमुख महानगरांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. महानगरी मुंबई आर्थिक गुन्ह्यांसाठी देशात अव्वल असून, २०२१ मध्ये ५,६७१ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत ५,१०२ आर्थिक गुन्हे घडले असून, यात १४ टक्के वाढ झाली आहे. ती वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

देशात गुन्हे का वाढले? n कोरोना साथीच्या आजाराने २०२० मध्ये देशात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. n नागरिक घरांमध्ये होते. त्यामुळे आर्थिक गुन्ह्यांच्या संख्येतही घट झाली होती. n मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. n त्यामुळे गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले असल्याने गुन्ह्यांत वाढ झाली आहे.

न्यायासाठी करावी लागतेय प्रतीक्षादेशात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासंदर्भात मात्र तपासच होत नसल्याचे अहवालातून समोर येते. गेल्या वर्षभरात ५५.५ टक्के आर्थिक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. 

शहर      फसवणूक     वाढ मुंबई     ५,६७१      ४४.४%दिल्ली     ५,१०२     १४.८%हैदराबाद    ४,८६०      ४१.८%जयपूर     ४,२७५     ३२.९% लखनाै     ३,४४०     ५४.७%

सर्वाधिक आर्थिक फसवणूकीचे राज्येराज्य     फसवणूक     वाढ राजस्थान     २३,७५७     २८.२%तेलंगणा     २०,७५९     ६०%उत्तर प्रदेश २०,०२६     २०%महाराष्ट्र    १५,५५०     २४.८%आसाम     ११,८०९    १९.४%

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी