शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांशी भांडण झाल्याने आयकर अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:03 IST

मुंबईत आयकर विभागात निरीक्षक म्हणून काम करतात मुलाचे वडील 

 

नवी मुंबई - वाशीच्या खाडीत मंगळवारी एका १४ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. हा मृतदेह वाशी खाडीच्या काठावर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाच्या अंगावरील शाळेच्या गणवेषावरून वडिलांनी मुलाला ओळखले असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. हा मुलगा नेरुळ येथील अपेज्जी शाळेत बारावीत शिकत होता. वडिलांशी भांडण करून शाळेत गेलेला हा तरुण घरी न परतल्याने वडिलांनी नेरुळ पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याबाबत तक्रार नोंद केली होती. 

वडाळ्यातील अँटॉप हिल येथे राहणाऱ्या या तरुणाने वडिलांशी भांडण करून वाशीच्या खाडीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १९ जुलैला एक तरुण हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.  अपेज्जी शाळेत बारावी शिकणारा हा तरुण १९ जुलै रोजी दुपारी शाळेतून निघाला आणि त्याने रिक्षा पकडली. त्याच्या शाळेतील मित्राने दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा नेहमी लोकलने प्रवास करायचा. पण नेमकं त्या दिवशी त्याने रिक्षा पकडली. शिवाय तो कोणत्यातरी विचारात होता. एरव्ही सुद्धा कमी बोलायची सवय असल्यामुळे तो त्यादिवशी अस्वस्थ का आहे ते विचारले नाही, ही माहिती त्याच्या मित्राने दिली. त्या मित्राने त्याला शेवटचे पाहिले त्यानंतर त्याला कोणीही पाहिले नाही. तो घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली. २४ जुलैला वाशी खाडी परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना एक मृतदेह सापडला. मृतदेहावरील शाळेचा गणवेशावरुन या मुलाची ओळख पटली असल्याची माहिती देशमुख दिली आहे. 

मृत मुलाचे वडिलांशी काही कारणावरुन भांडण झाले होते. त्याने वडिलांना मेसेज करुन मी घरी येणार नाही. घरातल्यांची काळजी घ्या, असे मेसेजमध्ये म्हटले होते. पोलिसांना या मेसेजचे लोकेशन वाशी खाडी असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. मुलाचे वडिल आयकर विभागात अधिकारी असल्यामुळे अपहरणाच्या दृष्टिने देखील हा तपास केला जात होता. पण मंगळवारी या तरुणाचा मृतदेह सापडला आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईSuicideआत्महत्या