शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वडिलांशी भांडण झाल्याने आयकर अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:03 IST

मुंबईत आयकर विभागात निरीक्षक म्हणून काम करतात मुलाचे वडील 

 

नवी मुंबई - वाशीच्या खाडीत मंगळवारी एका १४ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. हा मृतदेह वाशी खाडीच्या काठावर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाच्या अंगावरील शाळेच्या गणवेषावरून वडिलांनी मुलाला ओळखले असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. हा मुलगा नेरुळ येथील अपेज्जी शाळेत बारावीत शिकत होता. वडिलांशी भांडण करून शाळेत गेलेला हा तरुण घरी न परतल्याने वडिलांनी नेरुळ पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याबाबत तक्रार नोंद केली होती. 

वडाळ्यातील अँटॉप हिल येथे राहणाऱ्या या तरुणाने वडिलांशी भांडण करून वाशीच्या खाडीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १९ जुलैला एक तरुण हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.  अपेज्जी शाळेत बारावी शिकणारा हा तरुण १९ जुलै रोजी दुपारी शाळेतून निघाला आणि त्याने रिक्षा पकडली. त्याच्या शाळेतील मित्राने दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा नेहमी लोकलने प्रवास करायचा. पण नेमकं त्या दिवशी त्याने रिक्षा पकडली. शिवाय तो कोणत्यातरी विचारात होता. एरव्ही सुद्धा कमी बोलायची सवय असल्यामुळे तो त्यादिवशी अस्वस्थ का आहे ते विचारले नाही, ही माहिती त्याच्या मित्राने दिली. त्या मित्राने त्याला शेवटचे पाहिले त्यानंतर त्याला कोणीही पाहिले नाही. तो घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली. २४ जुलैला वाशी खाडी परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना एक मृतदेह सापडला. मृतदेहावरील शाळेचा गणवेशावरुन या मुलाची ओळख पटली असल्याची माहिती देशमुख दिली आहे. 

मृत मुलाचे वडिलांशी काही कारणावरुन भांडण झाले होते. त्याने वडिलांना मेसेज करुन मी घरी येणार नाही. घरातल्यांची काळजी घ्या, असे मेसेजमध्ये म्हटले होते. पोलिसांना या मेसेजचे लोकेशन वाशी खाडी असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. मुलाचे वडिल आयकर विभागात अधिकारी असल्यामुळे अपहरणाच्या दृष्टिने देखील हा तपास केला जात होता. पण मंगळवारी या तरुणाचा मृतदेह सापडला आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईSuicideआत्महत्या