शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

बागेतून तब्बल १५ हजार लिंबू चोरीला; शेतकऱ्यांनी ५० जण ठेवले राखणीला, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 15:45 IST

शेतकऱ्यांनी चोरी रोखण्यासाठी रोजंदारीवर ठेवले राखणदार; दिवसाचा खर्च २२ हजार

आंब्याचा हंगाम सुरू असताना भाव मात्र लिंबू खाऊन जात आहे. सध्या देशभरात लिंबांच्या दराची सर्वाधिक चर्चा आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्यावर अनेकजण लिंबू सरबत पिणं पसंत करतात. मात्र सध्या लिंबूचा दर ऐकून अनेकांना घाम फुटला आहे. लिंबाचे दर इतके वाढलेत की आता त्याची चोरी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील कानपुरात अशीच एक घटना घडली आहे. बिठूर येथील बागेतून १५ हजार लिंबू चोरीला गेले आहेत.

बिठूर येथे गंगेच्या किनारी भागात लिंबाचं उत्पादन घेतलं जातं. लिंबाचे दर वाढल्यापासून चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लिंबांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी रखवालदार तैनात केले आहेत. लिंबाच्या बागेची रखवाली करण्याचं काम ५० जणांवर सोपवण्यात आलं आहे. या रखवालदारांना ४५० मुजरी दिली जाते. त्यामुळे रखवालदारांवर दररोज होणारा खर्च २२ हजार ५०० रुपयांच्या घरात जातो. 

याआधी शाहजहापूर आणि बरेलीत लिंबांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या. बरेलीच्या डेलापीर मंडईतून गेल्या रविवारी रात्री ५० किलो लिंबू चोरीला गेले. तर शाहजहापुरातील बजरिया भाजी मंडईतून ६० किलो लिंबू चोरट्यांनी लंपास केले. यासोबतच चोरट्यांनी ४० किलो कांदे आणि ३८ किलो लसूणदेखील लांबवला.

बिठूर पोलीस ठाण्यात बुधवारी अभिषेक निषाद यांनी लिंबू चोरीबद्दल एफआयआर दाखल केला. गेल्या ३ दिवसांत १ एकरमधून जवळपास १५ हजार लिंबू चोरीला गेल्याची तक्रारी अभिषेक यांनी नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. तर अभिषेक यांनी बागेतच मुक्काम ठोकला आहे. लिंबू पूर्ण पिकेपर्यंत ते बागेतच राहणार आहेत.