शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बागेतून तब्बल १५ हजार लिंबू चोरीला; शेतकऱ्यांनी ५० जण ठेवले राखणीला, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 15:45 IST

शेतकऱ्यांनी चोरी रोखण्यासाठी रोजंदारीवर ठेवले राखणदार; दिवसाचा खर्च २२ हजार

आंब्याचा हंगाम सुरू असताना भाव मात्र लिंबू खाऊन जात आहे. सध्या देशभरात लिंबांच्या दराची सर्वाधिक चर्चा आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्यावर अनेकजण लिंबू सरबत पिणं पसंत करतात. मात्र सध्या लिंबूचा दर ऐकून अनेकांना घाम फुटला आहे. लिंबाचे दर इतके वाढलेत की आता त्याची चोरी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील कानपुरात अशीच एक घटना घडली आहे. बिठूर येथील बागेतून १५ हजार लिंबू चोरीला गेले आहेत.

बिठूर येथे गंगेच्या किनारी भागात लिंबाचं उत्पादन घेतलं जातं. लिंबाचे दर वाढल्यापासून चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लिंबांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी रखवालदार तैनात केले आहेत. लिंबाच्या बागेची रखवाली करण्याचं काम ५० जणांवर सोपवण्यात आलं आहे. या रखवालदारांना ४५० मुजरी दिली जाते. त्यामुळे रखवालदारांवर दररोज होणारा खर्च २२ हजार ५०० रुपयांच्या घरात जातो. 

याआधी शाहजहापूर आणि बरेलीत लिंबांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या. बरेलीच्या डेलापीर मंडईतून गेल्या रविवारी रात्री ५० किलो लिंबू चोरीला गेले. तर शाहजहापुरातील बजरिया भाजी मंडईतून ६० किलो लिंबू चोरट्यांनी लंपास केले. यासोबतच चोरट्यांनी ४० किलो कांदे आणि ३८ किलो लसूणदेखील लांबवला.

बिठूर पोलीस ठाण्यात बुधवारी अभिषेक निषाद यांनी लिंबू चोरीबद्दल एफआयआर दाखल केला. गेल्या ३ दिवसांत १ एकरमधून जवळपास १५ हजार लिंबू चोरीला गेल्याची तक्रारी अभिषेक यांनी नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. तर अभिषेक यांनी बागेतच मुक्काम ठोकला आहे. लिंबू पूर्ण पिकेपर्यंत ते बागेतच राहणार आहेत.