शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

बागेतून तब्बल १५ हजार लिंबू चोरीला; शेतकऱ्यांनी ५० जण ठेवले राखणीला, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 15:45 IST

शेतकऱ्यांनी चोरी रोखण्यासाठी रोजंदारीवर ठेवले राखणदार; दिवसाचा खर्च २२ हजार

आंब्याचा हंगाम सुरू असताना भाव मात्र लिंबू खाऊन जात आहे. सध्या देशभरात लिंबांच्या दराची सर्वाधिक चर्चा आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्यावर अनेकजण लिंबू सरबत पिणं पसंत करतात. मात्र सध्या लिंबूचा दर ऐकून अनेकांना घाम फुटला आहे. लिंबाचे दर इतके वाढलेत की आता त्याची चोरी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील कानपुरात अशीच एक घटना घडली आहे. बिठूर येथील बागेतून १५ हजार लिंबू चोरीला गेले आहेत.

बिठूर येथे गंगेच्या किनारी भागात लिंबाचं उत्पादन घेतलं जातं. लिंबाचे दर वाढल्यापासून चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लिंबांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी रखवालदार तैनात केले आहेत. लिंबाच्या बागेची रखवाली करण्याचं काम ५० जणांवर सोपवण्यात आलं आहे. या रखवालदारांना ४५० मुजरी दिली जाते. त्यामुळे रखवालदारांवर दररोज होणारा खर्च २२ हजार ५०० रुपयांच्या घरात जातो. 

याआधी शाहजहापूर आणि बरेलीत लिंबांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या. बरेलीच्या डेलापीर मंडईतून गेल्या रविवारी रात्री ५० किलो लिंबू चोरीला गेले. तर शाहजहापुरातील बजरिया भाजी मंडईतून ६० किलो लिंबू चोरट्यांनी लंपास केले. यासोबतच चोरट्यांनी ४० किलो कांदे आणि ३८ किलो लसूणदेखील लांबवला.

बिठूर पोलीस ठाण्यात बुधवारी अभिषेक निषाद यांनी लिंबू चोरीबद्दल एफआयआर दाखल केला. गेल्या ३ दिवसांत १ एकरमधून जवळपास १५ हजार लिंबू चोरीला गेल्याची तक्रारी अभिषेक यांनी नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. तर अभिषेक यांनी बागेतच मुक्काम ठोकला आहे. लिंबू पूर्ण पिकेपर्यंत ते बागेतच राहणार आहेत.