शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवीन जोडपं हनीमूनला गेले, अचानक बायको झाली गायब; CCTV पाहून पतीला धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 08:38 IST

लग्नानंतर ५ ऑगस्टला दोघे हनीमूनसाठी जयपूरला आले. याठिकाणी चौमू पुलिया इथं एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती.

जयपूर – राजस्थानच्या जयपूर इथं हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मध्य प्रदेशातील नवी नवरी पतीसोबत हनीमूनसाठी जयपूरला आली होती. हे दोघेही पर्यटनस्थळ फिरल्यानंतर हॉटेलला पोहचले. त्यानंतर नवरा पुढील ठिकाणी जाण्यासाठी कार बुक करायला बाहेर पडला. काही वेळाने तो परत आला पण पत्नी तिच्या खोलीत नव्हती. पत्नीला सर्वठिकाणी शोधले परंतु तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

नवऱ्याने हॉटेलमध्ये लागलेले सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा पत्नी सामान घेऊन हॉटेलच्या बाहेर जाताना दिसली. तातडीने पतीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय युवकाचे २९ जुलैला २२ वर्षीय युवतीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ५ ऑगस्टला दोघे हनीमूनसाठी जयपूरला आले. याठिकाणी चौमू पुलिया इथं एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती.

हॉटेलच्या खोलीतून नवरी झाली गायब

दुपारीच्या १२ च्या सुमारास पती-पत्नी आमेर किल्ला भटकंतीसाठी गेले. त्यानंतर ३ वाजता ते हॉटेलमध्ये माघारी परतले. काही वेळ आराम करून संध्याकाळी रिंगस येथील बाबा खाटूश्याम मंदिरात दर्शन करण्याचं प्लॅनिंग केले. पत्नी खोलीत थांबली आणि पती हॉटेलशेजारीस कार बुक करण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर १५ मिनिटांनी पती हॉटेलच्या खोलीत आला तेव्हा पत्नी गायब झाली होती. पतीने तिला आवाज दिला पण ती सापडली नाही. मोबाईलवर कॉल केला परंतु तिने उचलला नाही. हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा पत्नी मोबाईलवर बोलत बोलत हॉटेलबाहेर पळताना दिसली.

लग्नाच्या एक आठवड्यानंतरच नवरी पळाल्यानंतर नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता ५ ऑगस्टला दोघे कपल हनीमूनसाठी जयपूरला आले होते. परंतु हॉटेलमध्ये पती-पत्नी यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. पती कार बूक करण्यासाठी गेला असता पत्नी नाराज होऊन हॉटेलमधून निघून गेली. पतीने पत्नीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल अशी माहिती पोलीस अधिकारी बजरंगलाल शर्मा यांनी दिली.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदार