शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

इचलकरंजीत युवकाचा खून; धारधार शस्त्राने केले वार, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 10:08 IST

काही दिवसांपूर्वी मित्रांबरोबर वाद झाला होता. या वादातूनच या तरुणावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

इचलकरंजी : येथील तीन बत्ती चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाचा खून झाला. राहुल बाबू दियालू (वय 22) असे त्याचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून एका कामगाराच्या मुलाचा धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दयाळ हा आपल्या कुटुंबियांसमवेत तीन बत्ती चौका नजीक राहत होता. त्याचा काही दिवसांपूर्वी मित्रांबरोबर वाद झाला होता. या वादातूनच राहुल याच्यावर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चाकूसारख्या धारदार शास्त्राने वार करून मारेकरी पळाले. रक्तबंबाळ झालेल्या राहुलला उपचारासाठी आयजीएम रुग्णालय दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. किरकोळ कारणातून त्याचा खून केला असल्याचे समजते.

याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करीत आहेत.  दरम्यान, आयजीएम रुग्णालय परिसरात मृताचे नातेवाईक व मित्र यांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजी